सध्या जगभरात गोडय़ा पाण्याची टंचाई आहे. भविष्य काळातील युद्धे भूमीसाठी नाही तर गोडय़ा पाण्यासाठी होतील अशी भविष्यावाणीही काही तज्ञांनी केली आहे. पण कदाचित मानवजातीवर तेवढी वाईट वेळ येणार नाही. कारण वाराणसीच्या कृषी वैज्ञानिकांनी पाणी वाचविणाऱया जीवाणूचा शोध लावला आहे.
हा बॅक्टेरिया अत्यंत गुणी असून तो वनस्पतींना किंवा रोपटय़ांना पाण्याअभावी सुकू देत नाही. या जीवाणूचा शोध बाष्पयुक्त मीठाच्या जमिनीत लागल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या जीवाणूमुळे झाडांना कमी पाणी घालावे लागते तसेच घातलेले पूर्ण पाणी झाड शोषू शकते. परिणामी पाण्याची मोठय़घ् प्रमाणावर बचत होते. या जीवाणूचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणाऱया पिकांच्या मूळाशी त्यांना स्थान दिल्यास कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल. गव्हासारख्या पिकाला पाण्याच्या तिन पाळय़ा देण्याऐवजी दोन पाळय़ांमध्ये काम भागू शकेल. पाणी पुरवठा कमी प्रमाणात करावा लागल्यास विजेची किंवा डिझेलचीही बचत होऊन शेतकऱयाला आधिक लाभ मिळू शकतो. गोडे पाणी पिण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगात आणले जाते. गोडे पाणी अमर्याद नसल्याप्रमाणे ते पिण्यासाठी अधिक प्रमाणात उपयोगात अणावे की शेतीसाठी हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. भविष्य काळात तो अधिकच तीव्र होत जाणार आहे. पण या जीवाणूनमुळे शेतीसाठी कमी पाणी लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील दूर होण्याची शक्यता करण्यात येईल.