प्रतिनिधी / बेळगाव
रंगपंचमीच्या आधी म्हणजेच शनिवारी परंपरेनुसार होळी साजरी झाली. प्रामुख्याने बेळगावमध्ये 5 गल्ल्यांची एकत्र होळी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार पाटील गल्ली, मुजावर गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली या गल्ल्यांची एकत्रित होळी पाटील गल्लीमध्ये पेटविली जाते.
ही होळी पेटविण्यासाठी आंबा भुवनमागे असणाऱया महालक्ष्मीच्या मंदिरातून अग्नि आणला जातो. याच अग्निच्या माध्यमातून पाटील गल्ली येथे होळी पेटविली जाते. या सर्व गल्ल्यांमध्ये होळी कामाण्णाची मंदिरे आहेत. परंतु मुख्य होळी पेटल्यानंतरच गल्लोगल्ली होळी पेटविली जाते.
या पाच दिवसांत होळीला हजारो नारळ अर्पण केले जातात. पाटील गल्ली येथील होळीचे यजमानपद उगळखोड घराण्याकडे आहे. त्याचे पौरोहित्य श्रीनिवास पाटील यांनी केले. चव्हाट गल्ली येथील नागरिक कामत गल्ली येथून होळीसाठी अग्नि घेऊन जातात. यंदाही ही परंपरा जपली गेली. दरवषीप्रमाणे मार्केट पोलीस स्थानकासमोर मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात रविवारी सामूहिक लोटांगण सोहळा पार पडला. शहरात पांगुळ गल्ली येथे अश्वत्थामाचे एकमेव मंदिर आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियमांच्या चौकटीत राहून लोटांगण विधी पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी प्रशासनाशी चर्चा केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीसुद्धा लोटांगणाचा विधी श्रद्धेने परंतु गर्दी न करता नियमांचे पालन करून पार पाडला. यासाठी भातकांडे, कुऱहाडे, मुतकेकर व रायमन वाझ या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला. शहर देवस्थान मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीसुद्धा कोरोनाचे संकट लक्षात घेत मर्यादित स्वरुपातच होळी व रंगपंचमी साजरी केली.