चेअरमन रविंद्र आपटे यांचा पलटवार
प्रतिनिधी / कोल्हापूर
आमच्या दृर्ष्टीने गोकुळ मल्टिस्टेटचा विषय तेव्हांच संपलेला आहे. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच यासाठी पुढाकार घेवून हा विषय रद्द करण्याचा निर्णय आहे. परंतु कालबाह्य झालेला विषय विरोधक पुन्हा उकरुन काढत आहेत. शिळÎा कढीव ऊत आणून पालकमंत्री सभासदांची दिशाभुल करीत आहेत. असा पलटवार गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी केला आहे. प्रसिध्दी पत्रकातुन त्यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा तिकट शब्दात समाचार घेतला आहे.
गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मल्टीस्टेट हा विषय रद्द केला.
गोकुळचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच यासाठी आग्रह धरला होता. ज्या मुद्यावर सभासदांच्या अडचणी होतील असे वाटते तसे विषय सभेसमोर घेऊ नका, सभासदांचे ज्यामध्ये समाधान होईल तेच विषय हाताळा असे ते नेहमी सांगत असता. विरोधकांकडे सध्या कोणताही मुद्दा नसल्यानेच संपलेले विषय उगळले जात आहेत. पालकमंत्री पुन्हा त्या विषयावर सभासदांचे लक्ष खिळवू पहात आहेत. असे पत्रकात म्हटले आहे.
सभासदांच्या अहिताचे विषया आम्ही हाताळणार नाही व यापुर्वीही तसे घडलेलेही नाही. ज्यांनी मल्टीस्टेटचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला ते स्वतः सध्या त्यांच्या सोबत आहेत. गोकुळ हा शेतकऱयांच्या मालकीचा असून शेतकऱयांच्याकडे राहिला पाहिजे. यासाठी त्यांच्या हिताचेच निर्णय गोकुळमध्ये घेतले जातात. शेतकऱयांना आणखी जादा दर देता यावा यासाठीच संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा पुढे आला होता आता तो मागे पडला आहे. सभासदांनी विरोधक आणि त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेवू नयेत असे आवाहनही आपटे यांनी पत्रकात केले आहे.
मल्टीस्टेटवालेच गोकुळच्या विरोधात एकत्र
ज्यांच्या संस्था मल्टीस्टेट आहेत तेच गोकुळच्या विरोधात बोलत आहेत हे हस्यास्पद आहे असा आरोप चेअरमन रविंद्र आपटे यांनी पत्रकात केला आहे. मंडलिक कारखाना मल्टीस्टेट, वारणा दूध संघ मल्टीस्टेट, संताजी घोरपडे खासगी, बंद पडलेला महालक्ष्मी दूध संघ मल्टीस्टेट अशा नेत्यांना गोकुळवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सर्व सामान्य सभासदांना आम्ही चांगल्या कारभाराचा विश्वास दिला आहे. ते आमच्या सोबत आहेत असा दावा आपटे यांनी शेवटी पत्रकात केला आहे.