दोन वर्षाच्या कोविड काळात मुंबई शहर महामारीने वेठीस धरले. त्यामुळे यंदाच्या मुंबई पालिका बजेटमध्ये मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार झाला नसता तर नवलच. या बजेटमध्ये तो अपेक्षपेक्षा अधिक झाला. याला कारण कोविडची पार्श्वभूमी आहे. त्याप्रमाणे मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करुन पालिकेच्या बजेटमधून आरोग्यम् धनसंपदाचा जप जपण्यात आला. तोंडावर आलेल्या पालिकेच्या निवडणुका दृष्टिपथात घेऊन हे गाजर असल्याची टीका होत असली तरीही हे ही नसे थोडके… असेच म्हणावे लागेल. मात्र तरीही आतापर्यंत मुंबईकरांच्या काही आरोग्य मागण्या स्वप्नवत् राहिल्या. अशा शंकांचे निरसन होताना दिसून येत नाही…
यंदा केंद्र, राज्य आणि महापालिकांच्या बजेटला आरोग्य क्षेत्रातील तरतूदींची झालर राहणार असा अंदाज सुरुवातीपासूनच करण्यात येत होता. याला कारण कोविडची पार्श्वभूमी तसेच तोंडावर आलेल्या निवडणुका अशी चर्चा केली जात आहे. सतत दोन वर्षे कोरोना महामारी आणि कोरोनातील विविध व्हेरियंटचे आक्रमणाने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोविड काळात सार्वजनिक आरोग्य सेवा उघडय़ावर आली. कोणत्याही महामारीला सामोरे जाण्याची ताकद सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये नाही असे महामारीत दिसून आले. मात्र त्यातून सावरुन सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये त्वरीत बदल करण्यात आले. तरीही एखाद्या महामारीला तोंड देण्याची कुवत शहराच्या आरोग्य यंत्रणेत नसल्याचे सत्य ठसठशीतपणे समोर आले. याच काळात रुग्णांनी तुंडुंब भरलेली सार्वजनिक रुग्णालये चित्र पाहता घाईघाईत उभारण्यात आलेली कोविड केंद्र, तेथील मनुष्यबळाचा तुटवडा, आजार निदानासाठी लागणाऱया वैद्यकीय उपकरणांची कमतरता, खाटा, प्रयोगशाळा या बाबींची कमतरता लख्ख प्रकाशाप्रमाणे आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दर्शवत होत्या. कोविड या त्रुटींचा प्राधान्याने विचार करण्याचा अनुभव देऊन गेला. त्यामुळेच या वेळच्या मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 15 टक्के रक्कम आरोग्यावर खर्च केली जाणार आहे. देशात कुठेही नाही अशी ही आरोग्य तरतूद यावेळच्या बजेटचे वैशिष्टय़ राहिले. यंदाच्या महापालिकेच्या बजेटमध्ये आरोग्यासाठी 6933.75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ नसलेला तसेच आरोग्याला प्राधान्य देणारा असा हा पालिकेचा अर्थसंकल्प आहे. एकूण 45949.21 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेत सादर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 17.70 टक्क्यांची वाढ या बजेटमध्ये करण्यात आली आहे. तर आरोग्याचे बजेट 1800 कोटींनी वाढले असून एकूण 6933.75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे सात हजार कोटींची तरतूद यात करण्यात आली आहे. आरोग्य बजेटमधून मुंबईकरांना घराजवळच आरोग्य सुविधा देण्यासाठी 200 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच मुंबईकरांच्या आरेग्यासाठी योगाचे धडे देणारी 200 शिव योग पेंद्रे सुरू करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात दिसून येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाला रोखताना आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाल्याने पालिकेच्या यावर्षीच्या बजेटमध्ये आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले आहे. यात मुंबईकरांना घराशेजारीच उपचार, तसेच प्रमुख उपनगरीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्रे, या आरोग्य केंद्रांमध्ये एक्स रे, सीटी स्पॅन, मॅनोग्राफीसारख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच पेंद्रांवर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून केईएम, शीव, नायर व कूपर या प्रमुख रुग्णालयातील विशेष डॉक्टरांचे वैद्यकीय सल्ले, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयरोग सारख्या सहव्याधी आजारांची तपासणी अशा अनेक वैशिष्टय़ांनी हे बजेट रुग्णाभिमुख असल्याचे मांडण्यात येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 100 तर दुसऱया टप्प्यात 100 अशी 200 आरोग्य पेंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपक्रमासाठी भांडवली खर्चासाठी 250 तर महसुली खर्चासाठी 150 कोटी तरतूदीतून तजवीज करण्यात आली आहे. हे सगळे सकारात्मक मुद्दे मांडत असताना काही सवालही उपस्थित करण्यात आले. जसे उपनगरात सुपरस्पेशालिटी रुग्णालयांचा अद्यापही ठाव†िठकाणा नाही. काही वर्षापासून उपनगरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी सतत होत आहे. गेल्या काही वर्षाच्या कालावधीत त्या दिशने अद्याप पाऊल उचलले दिसून येत नाही. पूर्व तसेच पश्चिम उपनगरात एखादे सुपर स्पेशालिटी रुग्णालय झाल्यास पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरील रुग्णभार नक्की कमी होणारा आहे. यावर बजेटमधून विचार करण्यात येत नाही. त्याचवेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल प्रमाणे उपनगरात कर्करुग्णालय असावे अशी मागणी काही वर्षापासून होत आहे. पालिकेकडे कर्करोगावरील औषधे आणि उपकरणे असल्याचे नगरसेवक सांगतात. मात्र पालिकेचे रुग्णालय उपनगरात का सुरु होत नाही असा प्रश्न पडतो. दरम्यान महानगर पालिकेच्या प्लॉटवर सेव्हन हॉस्पिटल कर्करुग्णालय करण्याच्या हेतूनेच सुरु करण्यात आले. कारण हा भूखंड पॅन्सर रुग्णालयासाठी राखीव होता. हे रुग्णालय 2007-08 च्या दरम्यान बांधून झाले. त्यावेळी महानगरपालिकेने तेवढा निधी नसल्याने हे रुग्णालय पीपीपी धरतीवर हैद्राबादमधील संस्थेला चालवायला दिले. मात्र त्या संस्थेने पालिकेच्या अटी पूर्ण केल्या नाही. म्हणून पालिकेने ते 2017 या वर्षात ताब्यात घेतले. त्यावेळी ती संस्था कोर्टात गेली. मात्र दरम्यान कोविड सुरु झाल्याने कोविड विशेष रुग्णालय सुरु करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडे कर्करोग उपचाराची उपकरणे, औषधे आणि तज्ञही आहेत.
राम खांदारे