प्रतिनिधी/ सातारा
स्वच्छ सातारा, सुंदर सातारा हे नुसतेच ब्रिद वाक्य अजूनही घंटागाडीच्या कर्णावरुन ऐकायला मिळते. परंतु प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यातच पाच महिन्यापासून आरोग्य विभागातील कर्मचाऱयांचे पगार दिले गेले नसल्याने काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे शहरात सगळीकडे कचरा तसाच पडून असल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग डाराडुर झाला असून आरोग्य विभागात सध्या कोरोनाच्या काळात जे कोरोना योद्धा म्हणून खऱया अर्थाने काम पहात आहेत. त्या पोलिस वसाहतीची स्वच्छता देखील पालिकेच्या आरोग्य विभागाकडून होताना दिसत नाही.
स्वच्छ भारत अभियानाच्या नावाआडून सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे. तब्बल पाच महिन्यांचे आरोग्य विभागातील बिगाऱयांचे पगार दिला नाही. कामगार कायद्यानुसार किमान वेतन देणे अपेक्षित असताना हातावर केवळ चार अन् तीन हजार दिले जात होते. तेही या संकट काळात बंद केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात स्वच्छतेचे काम बंद केले आहे. पालिकडे असे सव्वाशे कामगार काम करतात. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाने गलका करणारा आरोग्य विभागास सध्याच्या कोरोनाच्या संकटात जे योद्धे म्हणून काम करत आहेत. त्या पोलिस कर्मचाऱयांच्या वसाहतीत अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ही वसाहत पालिकेच्या समोरच असून अतिशय दयनिय अवस्था आहे. गवत वाढले आहे. गटारे तुंबली आहेत. या परिसरातील कचऱयाच्या कुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. औषध फ<वारणी तर केली गेली नाही. त्यामुळे कोरोना काळात लढणाऱया या लढवय्या पोलिसांच्या घराजवळ अस्वच्छतेचे सामाज्र पालिकेच्या आरोग्य विभागामुळे दुर्लक्षामुळे होत आहे. हे आरोग्य विभागास दिसत नाही.
शहरात रस्तो रस्ती दिसत आहेत कचऱयाचे ढिग
म्हणे स्वच्छ सातारा शहर आहे. शहरात दररोज तयार होणारा कचरा हा घंटागाडय़ा घेवून जात असल्या तरीही कचरा रस्त्यावर पडतोय. यालाच कारण आरोग्य विभागाचे ढासळलेले नियोजन. अधिकाऱयांची वागण्याची चुकीची पद्धत. त्यामुळे शहरात सगळीकडे कचऱयाचे ढिगच दिसत आहेत.
बर झालं सुहास पवारांना आरोग्य विभाग प्रमुख केलं
ज्या सुहास पवारांना एक लाभ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजूर होण्यापूर्वीच घेतल्याची चर्चा आहे. त्यांनाच आता आरोग्य विभागाच्या प्रमुख पदाची सुत्रे दिली गेली आहेत. वास्तविक त्यांच्याकडे पद दिल्यामुळे अनेक नगरसेवकांनाही बरं झाल त्यांच्याकडे आरोग्य विभाग दिला गेला. आता चुकले की माफ नाहीच. मग कोव्हिडचा निधी बरोबर खर्च केला गेला पाहिजे. चांगल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. अन्यथा पुन्हा आहेतच आरोग्य विभाग प्रमुख म्हणून सुहास पवार. मग सभागृहात पंचनामा होताना नेते येणार नाहीत, स्पष्टीकरण द्यायला, अशी काही नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली गेली. त्यामुळे सुहास पवारांनीही राजकारण, गेमा बाजूला ठेवून आरोग्य विभागाची सुत्रे हलवावीत, अशी चर्चा पालिकेच्यावतुर्ळात रंगत आहे.