चंद्रकांत खंडाईत यांनी केली खंत व्यक्त
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात पालिकेच्या कर्मचाऱयांनी मेहनत घेतली. त्यांच्यामुळे सातारा शहराचा स्वच्छतेत चौथा क्रमांक आला. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱयांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे होते. परंतु त्यांच्याकडून तसे काही झाले नाही, अशी खंत अखिल महाराष्ट्र पालिका कामगार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केली आहे.
सातारा पालिकेच्या गेटवर घेण्यात आलेल्या अखिल महाराष्ट्र पालिका कामगार संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱयांचा सत्कार फुलांचा गुच्छ देवून करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत खंडाईत म्हणाले, सातारा शहरातील प्रत्येक वॉर्डात कोरोनाच्या दोन वर्षात स्वतःच्या जीवावर उदार होवून काम केले. त्यांच्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांना सुविधा मिळाल्या. त्याच कर्मचाऱयांच्यामुळे शहराचा दिल्ली दरबारी गौरव झाला. पालिकेने हे जाणलं गेले पाहिजे होते. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱयांच्या पाठीवर सत्कार करुन कौतुक करणे गरजेचे होते. परंतु त्यांच्याकडून तसे काही झाले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही सत्कार करतो आहे, असेही त्यांनी सांगितले.