पावसाचा जोर वाढला, घाट भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा: नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेची सूचना
प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपर्यंत रेड अलर्टची सूचना केल्याने जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. मंगळवारी धरण क्षेत्रासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने किरकोळ विक्रेते, व्यापाऱयांची तारांबळ उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी (8 रोजी) जिह्याच्या घाट भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱया सूचनांकडे नागरीकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिह्यातील सर्व नागरीकांना केले आहे. आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टीमुळे आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधाव असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
महापूर ओसरल्यानंतर गेले महिनाभर जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस होता. पंधरा दिवसांपासून पश्चिमेकडील तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. पण गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेर लावली. मंगळवारी पहाटेपासूनच वाऱ्यावर पावसाची रिपरिप सुरु झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
नाल्याशेजारील परिसरात भितीचे वातावरण
जुलै महिन्यातील महापूरातून सावरत असताना आता मंगळवारी दिवसभरात सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर शहरातील नाल्याशेजारील परिसरातील नागरीकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात महापूरापूर्वीच केवळ अतिवृष्ठीमुळे जयंती नाला ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे पुंभार गल्ली आणि सुतारवाडा परीसरात पाणी शिरले होते. आता मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे या परिसरातील नागरीक धास्तावले आहेत.
इचलकरंजी बंधारा पाण्याखाली
पंचगंगाच्या पाणीपाळीत किंचित वाढ झाली असून इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. पंचगंगेची पाणीपातळीत 15.9 फुटांपर्यंत पोहोचली असून सुर्वे- 17.4, रुई 42.3, इचलकरंजी 38.8, तेरवाड 36.3, शिरोळ -26.3 तर नृसिंहवाडी 22.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
राधानगरी धरणात 230.54 दलघमी पाणीसाठा
राधानगरी धरणात 230.54 दलघमी पाणीसाठा असून तुळशीमध्ये 97.56 वारणा 924.91, दूधगंगा-676.37, कासारी 73.86, कडवी 68.80, कुंभी 73.79, पाटगाव 98.65, चिकोत्रा 43.115, चित्री 52.900, जंगमहट्टी 32.00, घटप्रभा -32.690, जांबरे 23.230, आंबेआहोळ 30.978 दलघमी पाणीसाठा आहे.