आदळणाऱया लाटांनी मिऱया बंधाऱयाचे नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
अमवास्येच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या उधाणामुळे मिऱया किनाऱयावर अजस्त्र लाटांचे तडाखे बसत होते, मात्र पावसाने उंसत घेतल्याने त्याची तीव्रता काही अंशी कमी झाली. मात्र, लाटांच्या तडाख्याने तेथील धुपप्रतिबंधक बंधारा अधिकच ढासळला आहे. महिनाभराहून अधिक काळ बंधाऱयालगत अडकलेल्याह ‘स्टार बसरा’ जहाज लाटांच्या तडाख्यांनी अधिकच गलितगात्र झाले असून ते वाचवण्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोमवारी अमवास्येच्या पार्श्वभुमीवर किनारपट्टीवलील नागरिक विशेषतः मिऱयावासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातवरण होते. अमावास्येच्या उधाणाचा मोठा फटका किनाऱयाला बसण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आठवडाभर धुवाँधार बरसणाऱया पावसाने सकाळपासूनच विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उधाणाची तीव्रता काही अंशी कमी झाली.
उधाणाची तीव्रता कमी असली तरी अजस्र लाटा किनाऱयावर धडकत होत्या. त्यामुळे आधीच खिळखिळा झालेला धुपप्रतिबंधक बंधारा काही प्रमाणात वाहून गेल्याचे दिसून आले. यादिवशीही अजस्त्र लाटा बंधाऱयावर येऊन आदळत होत्या त्या थेट तेथील नागरिकांच्या बागायतीत जाऊन कोसळत होत्या.
जहाज अधिक क्षतीग्रस्त
चक्रीवादळात भरकटून मिऱया किनाऱयावर आलेले भले मोठे जहाज सुमारे दिड महिना झाले तरी तेथेच अडकून पडले आहे. लाटांच्या तडाख्याने जहाज वाळूत रुतले आहे. सोमवारी उधाणाच्या लाटा आदळून जहाज अधिकच क्षतीग्रस्त झाले. मोठय़ा लाटा जहाजावरून गेल्यामुळे ते जहाज आणखी किती दिवस त्या तग धरून राहणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जहाज वाचवण्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जहाज काढण्याला चार दिवसाचा ‘अल्टीमेटम’
बसरा स्टार एजन्सीचे भरकटुन मिऱया किनाऱयाला लागलेले इंधनवाहू जहाज किनाऱयावर अडकून बसले आहे. सोमवारी आमावस्येच्या उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्याना चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. या कालाधित त्यांनी जहाज भंगारात काढणे किंवा दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी पॅ. संजय उगलमुगल यांनी दिली.