डिचोली/प्रतिनिधी
गेले दोन दिवस दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पावसाची हजेरी असणारच असा अंदाज बांधलेल्या सर्वांचीच ऐन डिचोलीच्या आठवडा बाजारादिनीच पावसाने तारांबळ उडविली. संध्याकाळी सुरू झालेला पाऊस धो धो करून पडून न जाता रिपरिप चालूच ठेवल्याने लोकांचे हाल झाले. तसेच व्यापाऱयांना आपला माल प्लास्टिकच्या अच्छादनांच्या सहाय्याने झाकून ठेवावे लागले. त्यामुळे संध्याकाळी पावसाच्या बेगमीची खरेदी.करण्यासाठी येणाऱया ग्रहकांना खरेदी करताही आली नाही.
वदळी वातावरणामुळे राज्यात पावसाची शक्मयता व्यक्त. करण्यात आली होती. त्याचमुळे गेले दोन दिवस सर्वण ढगाळ वातावरण होते. पाऊस कधीही कोसळू शकतो अशीच परिस्थिती होती. परंतु डिचोलीत नेमक्मया आठवडा बाजाराच्याच दिवशी पावसाने हजेरी लावून चुकीचा वेळ साधला.
मे महिना सुरू असल्याने बाजारात सध्या पावसाच्या बेगमीचे सामान मोठय़ा प्रमाणात दाखल होते. सुकी तांबडी मिरची, सुकी मासळी, चवळी, हळसांदे, आमसुले अशा प्रकारचे वेगवेगळे सामान या बाजारात दाखल झाले होते. सकाळीपासूनच या सामानासाठी लोकांची झुंबड दिसून येत होती. तर दिवसभर कामानिमित्त बाहेर असणारे लोक संध्याकाळी बाजारात दाखल होतात.
परंतु संध्याकाळी नेमकी डिचोली शहरात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने लोकांना बाजारात फेरफटका मारणे गैरसोयीचे बनले. तसेच पावसापासून सामानाचे रक्षण व्हावे यासाठी व्यापाऱयांना आपला माल प्लास्टिकच्या अच्छादनांनी झाकून ठेवावा लागला. त्यामुळे ग्राहकांना मालाची पडताळणी करण्याची व तो खरेदी करण्याची संधीच मिळाली नाही. पावसाची रिपरिप बराच वेळ चालूच राहिल्याने व उशीरही झाल्याने अखेर व्यापाऱयांनी आपला माल गुंडाळण्यास सुरूवात केली. त्यामुळे ग्राहकांचीही निराशा झाली.
तसेच बाजाराला उपस्थित भाजी विपेत्यांनी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्री 8 वाजेपर्यंत थांबण्याचे नाव घेत नसल्याने भाजीची दुकाने गुंडाळली. या पावसामुळे बाजारात मात्र चिखल साचला होता. या चिखलातून वाट काढताना ग्राहकांना नाकीनऊ येत होते.