नागरिकांच्या सहकार्याने प्रकल्प यशस्वी : 51 लाख ली.पाण्याचा साठा
केळावडे / उदय सावंत
कर्नाटक सरकारकडून म्हादई नदीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक व गोवा पाण्याच्या संदर्भात मोठा वाद सुरू आहे. येणाऱया काळात गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याची कमतरता भासणार का, अशाप्रकारचा सवाल निर्माण झालेला आहे. यामुळे गोव्यातील नागरिकांनी जागरूक होऊन पावसाळय़ात पाण्याची साठवण करण्याची प्रक्रिया आत्मसात केल्यास मोठय़ा प्रमाणात पाण्याच्या टंचाईपासून आपण मात करू अशाप्रकारचा पर्याय पुढे आलेला आहे. सरकारकडून वारंवारपणे पावसाळय़ातील पाण्याची साठवण करण्याची प्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .मात्र याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. मात्र सत्तरी तालुक्मयातील केळावडे गावात समविचारी नागरिकांनी एकसंघ होऊन गोव्यातील पहिला पाणी साठवण प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 51 लाख 50 हजार लिटर पाण्याचा साठा झाल्याचे प्रकल्पाच्या प्रस्तावात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या प्रकल्पाला गोवा सरकारच्या एनर्जी व कन्झर्व्हशेन या खात्यातर्फे चांगल्या प्रकारचे पाठबळ लाभलेले आहे.
1984 साली केळावडे गावाचे पुनर्वसन
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंजुणे धरणाची संकल्पना ज्यावेळी राबविण्यात आली त्यावेळी संबंधित गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले. यात केळावडे गावांचा समावेश आहे. ज्याठिकाणी आता केळावडे गाव वसलेला आहे याठिकाणी मोठय़ा प्रमाणात घरे आहेत. या गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारने कूपनलिका खोदून त्याठिकाणी पंप बसविला. यासाठी पंपहाउसची उभारणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून या बोअरवेलच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वारंवारपणे निर्माण होणारी समस्या याच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी एकसंघ होऊन यावर मात करण्याचे ठरविले.
तीन टप्प्यात पाणी साठवणप्रक्रिया
दरम्यान, या संदर्भात जलसिंचन खात्याच्या यंत्रणेकडे संपर्क साधून उर्जा आणि संसाधन या खात्यातर्फे हा प्रकल्प राबविण्यासंदर्भात निश्चित करण्यात आले. यासाठी सरकारकडून 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या निधीचा वापर करून गावातील नागरिकांनी एकूण तीन टप्प्यांमध्ये पाणी साठवण प्रक्रिया हाती घेतली .यात पंप हाऊस यावरील छतावरील पाण्याचा वापर करणे, जमिनीच्या पृ÷भागावरील पाण्याची साठवण करणे व गावामध्ये असलेल्या बोरवेलचे रिचार्जिंग करणे याचा समावेश आहे. या तिन्ही प्रक्रियेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.
आतापर्यंत 51 लाख पाण्याचा साठा
यासंदर्भात अधिक माहिती देताना गावातील तरुण विनय गावस यांनी सांगितले की, या तीनही प्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास 51 लाख पाण्याचा साठा झालेला आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर या पाण्याच्य या गावासाठी जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. बोअरवेलच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असते. या प्रकल्पाच्या माध्यमातून बोअरवेलला समाधानकारक पाणी साठा उपलब्ध होणार असल्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही. त्याचप्रमाणे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी महत्त्वाची मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
केरी पंचायतीकडून चांगला प्रतिसाद
दरम्यान, पंप हाऊस छप्परावरून पाण्याची साठवण करण्याची प्रक्रिया यासंदर्भात केरी पंचायतीकडे ना हरकत दाखला मागितला होता. त्यांनी हा चांगला प्रयोग असल्याचे सांगून ना हरकत दाखला दिला. त्यामुळे केरी पंचायत मंडळाकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प विधायक स्वरूपाचा आहे. पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असते. अशा प्रकारची प्रक्रिया करून पाणी साठविण्याची पद्धत अंमलात आल्यास गावांमध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होत असल्याचे विनायक गवस यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारला अहवाल सादर
प्रकल्प सल्लागार प्रमुख संतोष गाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या प्रकल्पासंदर्भात हा अहवाल सरकारच्या जलसिंचन खात्याला सादर केलेले आहे .या प्रकल्पासाठी या खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. गावांमध्ये अशाप्रकारचा प्रकल्प राबविणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब असून येणाऱया काळात या प्रकल्पाचा आदर्श घेऊन गावांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱया काळात पाण्याची कमतरता याचा सारासार विचार केल्यास अशाप्रकारचे प्रकल्प गावांमध्ये राबविणे ही येणाऱया काळातील पाण्याची कमतरता याच्यावर मात करण्यासाठी महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कौतुकास्पद प्रयोग : प्रमोद बदामी
दरम्यान यासंदर्भात जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची विचारसरणी व पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रक्रिया खरोखरच कौतुकास्पद असल्याचे यावेळी ते म्हणाले. केळावडे गाव हा सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागांमध्ये अशाप्रकारे पावसाचे पाणी साठवण करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दिलेले योगदान यांचा आदर्श इतरांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱया काळात जलसिंचन खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकल्पांना निश्चितच प्रमाणात पाठबळ देण्याचा विचार करणार असल्याचे प्रमोद बदामी यांनी स्पष्ट केले आहे.