प्रतिनिधी/ बेळगाव :
खरीप पेरणी नुकतीच झाली आहे. भात, सोयाबिन तसेच इतर पिकांची उगवण होत आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शिवारात पाणी तुंबण्याची भिती व्यक्त होत आहे. जर पाणी साचले तर ही सर्व पिके वाया जाण्याची शक्मयता आहे. तेंव्हा पावसाने उघडीप दिली तरच सर्व पिकांना जीवदान मिळणार आहे, अन्यथा मोठा फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे. गुरुवारी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये दमदार तसेच संततधार पाऊस पडल्याने पाणतळ शिवारातील जमिनीमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस सतत राहिल्यास पाणी वाढण्याची शक्मयता आहे. आता काही ठिकाणचे नाले प्रवाहीत झाले आहेत. तर जमिनीमध्ये अधिक ओलावाही आहे. त्यामुळे अधिक पाऊस झाला तर शिवारात पाणी होणार आहे. याचबरोबर बळ्ळारी नाल्यासह इतर नाल्यांनाही अधिक पाणी येवून मोठेनुकसान होण्याची भिती शेतकऱयांतुन व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांच्यातुलनेत गुरुवारी पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये पावसाची रिपरीप सुरु होती. मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने उघडीप पडली होती. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात पुन्हा पावसाच्या हलक्मया सरी कोसळल्या. पाऊस कमी होईल, अशी अपेक्षा शेतकऱयांतुन व्यक्त होत आहे. येळ्ळूर परिसरातील बळ्ळारी नाल्याजवळ काही ठिकाणी असलेल्या शिवारात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे पाणी साचले असून अधिक पाऊस झाला तर मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.