भाजीपाला-टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱयांची आर्थिक कोंडी : निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागला
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसरातील जोमात आलेली भातपिके कोमेजून जात आहेत. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. शिवारात पाणीच नसल्यामुळे तणाचे प्रमाण वाढल्यामुळे निसर्गाच्या या लहरीपणाला शेतकरी वैतागून गेला आहे. अशा परिस्थितीत शेती कशी करायची? हा मोठा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा असल्याचे दिसून येत आहे.
प्रथम कोरोना, आता पाऊस
गेल्या दोन वर्षांपासून आपल्या देशावर उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे रोग आटोक्मयात आणण्यासाठी शासनाने बाजारपेठा बंद ठेवल्या. त्यामुळे भरघोस पीक येऊनही त्याला उठाव नसल्याने भाजीपाला पिकावर नांगर फिरवावा लागला. उन्हाळी मिरची, कोबीसह इतर भाजीपाला पिकामध्ये प्रारंभी झालेल्या पावसाने मार्कंडेय नदीच्या पुराचे पाणी शिरून भाजीपाला कुजून मोठे नुकसान झाले. यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक अडचणीत आला.
पावसामुळे चिंतेत भरच
कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड परिसरामध्ये 50 टक्के रोपलागवड तर 50 टक्के भातपेरणी केली जाते. भात पेरणीमध्ये पेरलेल्या भाताची वाफ (उगवण) उत्तम झाल्यास दोन वेळा कोळपणी केल्यास तसेच पावसाने चांगली साथ दिल्यास भातपीक जोमात येते. रोप लागवडीमध्ये चार दिवस भरपूर काम लागते. रोप लावून झाल्यानंतर पुढे पावसाने चांगली साथ दिल्यास भात पेरणीपेक्षा रोप लागवडीचे पीक जोमात येऊन उत्पादनही भरघोस मिळते. परंतु, मार्कंडेय नदीला पूर आल्यामुळे कोवळे भातरोप पाण्यात कुजून गेले. यामुळे कुजलेल्या भाताच्या ठिकाणी पुन्हा रोप लागवड करावी लागली. एकूणच यावषी शेतकरीवर्गाला निसर्गाने कधी स्वस्थ बसूच दिले
नाही.
अतिवृष्टीमुळे भातपीक कुजून गेले. त्यानंतर शेतात आलेला गाळ उपसा करून आणि जमीन समतल करून पुन्हा रोप लागवड करण्यात आली. यासाठी शेतकऱयांना बराच खर्च करावा लागला असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. इतके सारे करूनही पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत
आहे.
शेतकऱयांनी उत्पादनच बंद केले तर?
भाजीपाला तसेच इतर अन्नधान्याची आवक जास्त झाली म्हणून दर पाडले जातात. उत्पादनाला मातीमोल किंमत दिली जाते. यामुळे शेतकऱयाने उन्हा-पावसात राबून घेतलेले कष्ट वाया जातात. माणसाकडे कितीही पैसा असला तरी तो अन्नाची जागा घेऊ शकत नाही. माणसाच्या पोटाला शेतकऱयाने पिकविलेले अन्नच जरुरी आहे आणि ही गरज शेतकरी अतोनात कष्ट घेऊन भागवत असतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. साहजिकच शेतकऱयाच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळणे गरजेचे आहे. बाजारपेठेत मालाला मिळणाऱया कवडीमोल दराला कंटाळून शेतकऱयाने शेती करणेच बंद केले तर काय परिस्थिती निर्माण होईल? याचा विचार होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.