ऐन पावसाळी दिवसातच कडक ऊन : पिके सुकून जाण्याच्या मार्गावर : भातपिकाला करपा-तांबेरा रोगाची लागण : पावसासाठी शेतकऱयांच्या नजरा आभाळाकडे
वार्ताहर / किणये
कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी तर कधी बाजारभाव गडगडणे अशा दुष्टचक्रात तालुक्मयातील बळीराजा सापडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. ऐन पावसाळय़ाच्या दिवसात व पीकपाणी बहरून येण्याच्या कालावधीतच कडक उन्हाचे चटके बसू लागले असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर भातपिकाला करपा व तांबेरा रोगाची लागण झाली असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
यंदा दीड महिनाभरापूर्वी पावसाने शहरासह तालुक्मयाला चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतशिवारात पाणी साचून पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे अनेक गावांचे संपर्क रस्तेही बंद झाले होते. त्यावेळी पावसाची स्थिती पाहता यंदा मोठय़ा प्रमाणात पाऊस होणार, असेच साऱयांना वाटत होते. मात्र, मुसळधार पावसानंतर उघडीप पडली अन् गेले पंधरा दिवस पावसाने पाठच फिरविली आहे.
शिवारात सध्या पीकपाणी बहरून आलेले आहे. या कालावधीत दमदार पावसाची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने व कडक ऊन पडत असल्याने भात, रताळी, भुईमूग, नाचणा, सोयाबीन, बटाटा आदी पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. आधीच मुसळधार पावसात पिकांचे नुकसान झाले आहे व आता पीक फळधारणेला आले असताना पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली आहे.
भातपिकावर करपा व तांबेरा रोग पडलेला आहे. यामुळे रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यासाठी शेतकऱयांची धडपड दिसून येत आहे. दमदार पाऊस झाल्यास करपा व तांबेरा रोगाचे प्रमाण कमी होते, असे जाणकार शेतकऱयांनी सांगितले. तालुक्मयात बहुतांशी भागात धूळवाफ पेरणी करण्यात आली होती. या धुळवाफेतील भातपिकाची बऱयापैकी उगवण झाली होती. या पिकात एक-दोन वेळा कोळपणीही झाली. मात्र, यानंतर संततधार पाऊस झाल्यामुळे शेतशिवारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून बहुतांशी शिवारातील भातपिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले. यामुळे काही शेतकऱयांनी दुबार पेरणी केली तर रोपलागवड केलेल्या शिवारातही नदी-नाल्यांचे पाणी व गाळ येऊन रोपांचेही नुकसान झाले होते. नुकसानीनंतर शिल्लक राहिलेल्या भातपिकाची भांगलण व त्याची जोपासना करण्यात शेतकरी मग्न आहे. पण पावसाने उघडीप दिली असल्याने पेरलेल्या व लागवड केलेल्या भाताची वाढ खुंटून किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे भातपीक तांबूस रंगाचे दिसून येऊ लागले आहे.
ज्या शेतकऱयांच्या शिवारात कूपनलिका व विहिरी आहेत ते शेतकरी सध्या विद्युत मोटारीच्या साहाय्याने भातपिकाला पाणी देत आहेत. पण अन्य शेतकरी मात्र आभाळाकडेच नजरा लावून आहेत. तालुक्मयाच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांचे पाणी येऊन शेतशिवारातील बांध फुटून रताळी मेरा (बांध) रताळी वेलीसकट वाहून गेल्या. शिल्लक राहिलेल्या रताळी पिकावरच शेतकऱयांची आशा लागून आहे. पावसाच्या उघडिपीमुळे रताळी वेलींची वाढ खुंटली असून वेलींची पाने पिवळी पडू लागली आहेत. यामुळे रताळी उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडलेला आहे.
उत्पादन खर्च निघेल की नाही याची चिंता
तालुक्मयात भुईमूग पीक घेण्यात येते. भुईमूगच्या दोन-तीन वाणांची पेरणी शेतकऱयांनी केलेली आहे. भुईमूग पिकाच्या मुळांना जमिनीत शेंगा धरू लागल्या आहेत. अशा वेळी अधूनमधून पावसाची आवश्यकता असते. पाऊस पडला तर शेंगांचे उत्पादन बऱयापैकी मिळते. बेळगुंदी, यळेबैल, राकसकोप, कुदेमनी, सोनोली, बेळवट्टी, इनाम बडस आदी भागात नाचणा पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. यंदाही नाचण्याची लागवड शेतकऱयांनी केली आहे. मात्र, त्यानंतर पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असल्याने लागवड केलेले नाचणा पीक सुकून जाऊ लागले आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार की नाही? याची चिंता शेतकऱयांना सतावू लागली आहे.
पावसामुळे बऱयाच पिकांचे नुकसान झाले आहे. शिल्लक राहिलेल्या पिकांवरच शेतकऱयांची मदार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या दमदार पाऊस पडण्याची गरज असून तालुक्मयातील शेतकऱयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.