प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आह़े यात कारवांचीवाडी येथे घरांवर झाड कोसळल्याची घटना समोर आली आह़े तसेच गुरांच्या गोठय़ाचेही नुकसान झाले आह़े सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
जिह्यात सोसाटय़ाच्या वाऱयाबरोबर पावसाने दमदार हजेरी लावली आह़े या पावसाने बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत़ शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास जोरदार वाऱयामुळे गंगाराम कळंबटे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल़े तर राजेंद्र कांबळे यांच्या मालकीच्या गोठय़ावरही झाड पडल्याने मोठे नुकसान झाल़े
झाडे विजेच्या तारांवरही पडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होत़ा त्यामुळे शनिवारी या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र घालवावी लागल़ी तसेच रात्रीच्या वेळी झाडे हटविणे अशक्य बनल्याने रस्ताही वाहतुकीसाठी बंद झाला होत़ा यामुळे कामावरून घरी परतणाऱयांचेही हाल झाल़े अखेर रविवारी सकाळी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आह़े तर झाडांना हटवून रस्ताही मोकळा करण्यात आला आह़े सुदैवाची बाब म्हणजे या सर्व प्रकारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाह़ी