– उत्तर, दक्षिण, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा या सहा तालुक्यांना सर्वाधिक फटका
प्रतिनिधी / सोलापूर
मागील आठवडÎापासून सोलापूर शहर-जिह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिह्यातील 70 हजार 903 हेक्टरला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामध्ये 322 गावांतील 97 हजार 634 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका बार्शी, उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, माढा सहा तालुक्मयाला बसला आहे.
सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडÎात सोलापूर शहर-जिह्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. कित्येक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱयांची पिके वाहून गेली होती. सोलापूर जिह्यातील 322 गावे पावसामुळे बाधित झाली. यामध्ये उत्तर सोलापूर 41, दक्षिण सोलापूर 47, अक्कलकोट 12, मोहोळ 48, माढा 37, बार्शी 137 या गावांचा समावेश आहे. यामध्ये 51190.2 हेक्टर जिरायत, 16178 बागायत, 3535 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे.
तालुका गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र
उत्तर सोलापूर 41 23473 6775
दक्षिण सोलापूर 47 5601 3761
अक्कलकोट 12 730 594
मोहोळ 48 10582 12103.2
माढा 37 1294 2907
बार्शी 137 55954 44763
एकूण 322 97634 70903.2
उर्वरित तालुक्यातील आकडेवारी निरंक
सोलापूर जिह्यातील करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्मयातील नुकसानीची आकडेवारी निरंक दाखविण्यात आली आहे. केवळ उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, बार्शी या तालुक्मयातील 322 गावांचा समावेश आहे.