प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे भाजीची आवक काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे भाजीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. टोमॅटो 40 रुपये तर ढबू मिरची 80 रुपये किलो झाली आहे. दोडक्मयाचा दरही 60 रुपयांवर पोहोचला आहे. ऐन सणासुदीत भाज्यांचे दर वाढल्यामुळे जनतेला मात्र आर्थिक फटका बसू लागला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडली आहे. गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्मयातून येणाऱया भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. शनिवारी बाजाराच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यामुळे भाजी व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जनतेने गर्दी केली होती. किरकोळ भाजी विपेत्यांनी भाजीच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे खरेदीदारांतून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
श्रावण असल्यामुळे कोथिंबीर, मिरची, कडीपत्ता यांची मागणी अधिक असते. कोथिंबीरचा दरही पेंडीला 25 ते 30 रुपये झाला होता. ऐन सणासुदीतच भाज्यांचे दर वाढले आहेत. श्रावण असल्यामुळे भाजीला मागणी अधिक असते. या काळातच भाजीचे दर वाढले आहेत. पावसामुळे काही ठिकाणच्या भाजीची काढणी अशक्मय झाली आहे. याचबरोबर पाण्याखाली भाजी सापडून खराब झाली आहे. त्यामुळे आता यापुढे भाजीचे दर चढेच राहण्याची शक्मयता व्यापारीवर्गातून व्यक्त करण्यात आली.