पंचायत समिती व तालुका आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामपंचायतींना सुचना
वार्ताहर / कराड
सध्या कराडा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळयाच्या काळात डेंग्यु, च्कुणगुनीया व मलेरीया या सारखे अनेक साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात साथ रोग पसरू नये यासाठी उपाययोजना राबवण्यातबाबत पंचायत समिती व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सुचन करण्यात आल्या आहेत.
पावसाळयाच्या काळात नदी, नाले व ओढयाचे दुषत पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने गॅस्ट्रो, अतिसार, हागवण, कावीळ, कॉलरा, टॉयफाईड यासारखे साथीचे आजार पसरतात. तसेच या काळात डेंग्यु, चिकुणगुन्या व मलेरीया यासारखे किटकजन्य आजारही पसरत असतात. त्यामुळे ग्रामपंचायतींनी गावातील सर्व गटारींची स्वच्छता करून गटारे वहाती करावीत, पाण्याचे साठे हाऊ नयेत यासाठी खड्डे मुजवणेचे काम करावे, टायर व अन्य ठिकाणी साठलेल्या पाण्यात डासागंची मोठया प्रमाणात उत्पत्ती होते. त्याची दक्षता घ्यावी, आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, गप्पी मासे केंद्र तयार करावे, गावात धुर फवारणी करावी, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील पाणी स्त्रोतांची तपासणी, शुद्धीकरण व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करावी, ब्लीचींग पावडर, मडीक्लोरचा साठा करावा तसेच गावात मेडिक्लोरचे वाटप करावे आदी प्रकारच्या सुचना करण्यात आल्या आहेत.