गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारत हादरुन गेला होता. आता तिसर्या लाटेची टांगती तलवार आहे.
- पावसाळ्यात संसर्गजन्य आजार फैलावण्याची शक्यता वाढत असता कोरोनाबाबतही अनेक इशारे दिले जात आहेत.
- पावसाळ्यात प्रामुख्याने कॉलरा, इन्फ्लूएंजा, डेंग्यु, मलेरिया, अतिसार, चिकनगुणिया, मुदत ज्वर, श्वसनविकार यासारख्या आजारांचा प्रसार होतो. संसर्गजन्य आजार हा प्रामुख्याने तीन कारणांनी पसरतो. हवामान बदल, मानवी व्यवहार आणि संसर्गाचा स्वभाव. कोविड हा श्वसनाशी निगडीत आजार आहे आणि याची लक्षणे इन्फ्लूएंजा फ्लूसारखेच आहेत. कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात ताप येण्याचे प्रकार घडतात. यापूर्वी झालेल्या एका अभ्यासानुसार इन्फ्लूएंजा आणि सार्स आजार हा कमी तापमान आणि आद्रर्तमुळे पसरतो, असे आढळून आले आहे.
- संसर्ग पसरण्यास तीन प्रमुख गोष्टी कारणीभूत ठरतात. वातावरण बदल (तापमान, आर्द्रता, उष्णता), मानवाचे वर्तन आणि संसर्गाचा स्वभाव (संसर्ग पसरण्याचा वेग किंवा बदलणारी लक्षणे). कोरोनाची इन्फ्yलएंजाशी तुलना केली जात आहे. यामागचे कारण म्हणजे इन्फ्लूएंजाप्रमाणेच कोविड देखील श्वसनाशी निगडीत आजार आहे. परंतु दोन्ही संसर्गाचे स्वरुप धारण करण्याची पद्धत आणि मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यात बरेच अंतर आहे.
- फ्रँकफर्ट गोएथ विद्यापीठाचे संशोधक म्हणतात, की आम्हाला पावसाळ्यात युव्हीआय आणि कोविडमुळे झालेले मृत्यू यामागे असलेल्या कारणांत साधर्म्य दिसून आले. पावसाळ्यात कोविडमुळे दररोज होणार्या मृत्यूच्या दरात 13 टक्के घसरण झाली. भारतात कोविडमुळे दररोज होणार्या मृत्युच्या वाढीच्या दराची तुलना केल्यास पावसाळ्यापूर्वी पहिल्या दोन आठवडय़ात त्याचा वाढीच्या दरात 60 टक्के घसरण झाल्याचे निदर्शनास आले.
- कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्यात जगभरातील 144 ठिकाणांचा समावेश करण्यात आला. संशोधनात म्हटले, की तापमान आणि अक्षांशांसारख्या निकषाचा कोविडच्या प्रसाराचा कोणताही संबंध नाही.
- त्याचवेळी संशोधकांनी म्हटले की, आर्द्रता आणि संसर्गाचा प्रसार होणे यात असलेला संबंध हा असून नसल्यासारखा आहे.
- तात्पर्य एवढेच की भारतात कोविडमुळे मृत्युमुखी पडणार्या मृतांच्या वाढीच्या दरावर मॉन्सून हा स्वतंत्र रुपाने नकारात्मक प्रभाव टाकतो. असे असतानाही आपण निष्काळजीपणाने राहू नये. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. त्यामुळे स्वस्थ राहा आणि सुरक्षित राहा.