प्रतिनिधी / बेळगाव
पावसाने सुरुवातीला चांगली साथ दिल्याने पेरणीही पूर्ण झाली. मात्र मध्यंतरी दडी मारल्याने अनगोळ येथील शेतकऱयांनी कोटुंमभाव येथे पावसासाठी देवाला गाऱहाणे घातले. यावषी चांगला पाऊस पडू दे, पिके चांगली येऊ दे, गावात कोणत्याही प्रकारची रोगराई होवू नये, यासाठी सामुदायिक अनगोळ शिवाराच्या सीमेवरील कोटुंमभाव येथे गाऱहाणे घालण्यात आले.
प्रारंभी अनगोळ गावचे ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे गावातील सर्व शेतकरी व नागरिकांनी सकाळीच विधिवत पूजा केली. त्यानंतर देवाची पालखी काढण्यात आली. गावातील कलमेश्वर मंदिर, लक्ष्मी मंदिर, रेणुका मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर या ग्रामदेवतांची पूजा करून पालखी करलदंडेमार्गे कोटुंमभाव येथे नेण्यात आली. त्या ठिकाणी गावचे पुजारी तसेच शेतकरी बांधवांनी विधिवत पूजा करून देवाला नैवेद्य दाखविला.
देशावर व जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर क्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई उद्भवू नये आणि पिकांना पोषक असा पाऊस पडावा, असे गाऱहाणे घालून त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी ज्ये÷ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचमंडळी व शेतकरी उपस्थित होते.
अनगोळ गावात वार पाळणूक…
दरवषीप्रमाणे यंदाही अनगोळ गावामध्ये वार पाळणूक करण्यात येत आहे. सोमवार आणि शुक्रवार या दिवशी वार पाळणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारीदेखील पाळणूक करण्यात आली. तर दि. 18, 21, 25 आणि 28 रोजी गावात वार पाळणूक करण्यात येणार आहे. या काळात शेतीविषयक कामे पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहेत. मंगळवार दि. 29 जून रोजी गावातील सर्व देवदेवतांची ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.