दीड वर्षापासून तिकीट काढूनच प्रवास : लोंढा, कुडची, घटप्रभा येथील प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे धावत असली तरी रोजच्या प्रवासासाठी पास दिला जात नसल्याने प्रवास खडतर होत आहे. मागील दीड वर्षांपासून तिकीट काढूनच नोकरदारवर्ग प्रवास करीत आहेत. त्यामुळे पगारातील निम्मी रक्कम रेल्वे प्रवासासाठीच खर्ची पडत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेकांना हा खर्च पेलवत नसल्याने ते नोकऱया सोडून गावानजीकच रोजंदारी करत आहेत. त्यामुळे पासची सुविधा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाचा धोका वाढल्याने रेल्वे बंद करण्यात आल्या. त्यानंतर तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्यापासून रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली. परंतु कोरोनाच्या नियमावलीमुळे धावणाऱया सर्व रेल्वे या स्पेशल रेल्वे म्हणून सुरू करण्यात आल्या. या रेल्वेंमध्ये मासिक पास बंद करण्यात आले. नागरिकांना प्रत्येक दिवसाचे तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. याला दीड वर्ष उलटले तरी अद्यापही रेल्वेने पास देण्याकडे दुर्लक्षच केले आहे. याचा परिणाम प्रवाशांवर होत असून, त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एक दिवस आधी काढावे लागतेय तिकीट
रेल्वेप्रवास करण्यासाठी एक दिवस आधी तिकीट काढावे लागत आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर सकाळी 8 ते सायंकाळी 4.30 पर्यंत तिकीट देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱयांना उद्याचे तिकीट आजच काढावे लागत आहे. नोकरी-व्यवसाय करायचा की तिकीट काढण्याची धावपळ करायची? असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे अनेकांनी नोकऱया सोडल्या तर अनेकजण बेळगावमध्ये भाडोत्री खोली घेऊन राहत आहेत. गोकाक, घटप्रभा, कुडची, रायबाग, लोंढा, रामनगर येथील नागरिकांचे पासविना हाल होत आहेत.
लोंढा-रामनगरवासियांचा जीवघेणा प्रवास
कोरोनाच्या पूर्वी लोंढा, रामनगर येथील प्रवासी रेल्वेने बेळगावमध्ये येत होते. व्यवसाय, नोकरी, शिक्षण यासाठी येथील नागरिक बेळगाव शहरावरच अवलंबून आहेत. त्यांना महिन्याला 270 रुपयांचा पास काढल्यास रेल्वे प्रवास करता येत होता. परंतु मध्यंतरी रेल्वे बंद असल्याने नागरिकांना बसने 70 रुपये खर्च करून बेळगावला यावे लागत होते. खानापूर-लोंढा या रस्त्याची वाताहत झाली असून त्यांना जीव धोक्मयात घालून मिळेल त्या वाहनाने बेळगावमध्ये यावे लागते. रेल्वेचा पास मिळाल्यास त्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.