केरकचरा-झाडाझुडूपांनी तलाव व्यापू लागला : पर्यावरणाचा होतोय ऱहास : ग्रामपंचायतीसह संबंधित खात्याने लक्ष गरज
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
बेळगाव-पणजी महामार्गानजीक पिरनवाडी येथे असलेल्या तलावात सध्या बऱयापैकी पाणीसाठा आहे. मात्र, तलावाच्या बाजूला केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच तलावाच्या काठावर झाडाझुडूपांची वाढ झाली आहे. या तलावासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. यासाठी ग्राम पंचायतीमार्फत प्रयत्न व्हावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
पिरनवाडी नाक्मयाजवळील रस्त्याच्या बाजूला फार पूर्वीपासून तलाव आहे. या तलावाचे गेल्या दोन वर्षापूर्वी पिरनवाडी ग्राम पंचायतीमार्फत मच्छे-पिरनवाडी परिसरातील विविध संस्थांच्या सहकार्याने पुनरुज्जीवन करण्यात आले. या तलावात सध्या बऱयापैकी पाणीसाठा आहे. तलावाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर बॉक्साईट रोडच्या रुंदीकरणात येणाऱया झाडांचे खोड आणून या तलावात या खोडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते.
पिरनवाडी परिसरातील तलावात पहिल्यांदाच मोठय़ा झाडांचे खोड आणून त्याचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न यशस्वी ठरला असून पिरनवाडी तलावाच्या सभोवताली लावण्यात आलेल्या झाडांच्या खोडांना पालवी फुटली असून ही झाडे चांगलीच बहरलेली दिसू लागली आहेत. तलावाच्या मध्यभागी लावण्यात आलेले एक झाड मात्र सुकले आहे.
मच्छे परिसरातील काही सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पिरनवाडीत पाणीसाठा व्हावा यासाठी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. पूर्वीच्या तुलनेत तलावाची खोलीही वाढविण्यात आली. तसेच तलावाच्या काही भागाच्या काठावर जाळी बसविण्यात आली आहे. मात्र, तलावात व आजूबाजूला केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच तलावाच्या काठावर झाडेझुडूपेही वाढलेली आहेत. याची साफसफाई करण्याची गरज आहे.
बेळगाव-पणजी महामार्गानजीक या तलावाच्या काठावरच नव्याने भाजीमार्केट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विविध प्रकारची ताजी भाजी उपलब्ध होत असल्यामुळे पिरनवाडीसह परिसरातील नागरिक या ठिकाणचा भाजीपाला खरेदी करतानाचे चित्र अधिक पहावयास मिळत आहे. पिरनवाडी हे केंद्रबिंदू असल्यामुळे मच्छे, संतिबस्तवाड, हुंचेनहट्टी, बामणवाडी, बाळगमट्टी, नावगे, वाघवडे, रणकुंडये, किणये, कर्ले, बहाद्दरवाडी, झाडशहापूर, देसूर आदी भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी भाजी घेऊन येतात व याच भागातील नागरिक पिरनवाडीत भाजीपाला खरेदी करतानाही दिसतात. तसेच बेळगाव-पणजी महामार्ग असल्यामुळे गोव्याला जाणारा प्रवासीवर्गही इथला ताजा भाजीपाला खरेदी करीत आहे.
या भाजीपाल्याच्या ठिकाणी नागरिकांची अलीकडे गर्दी होऊ लागली आहे. तसेच पिरनवाडी परिसरात विविध प्रकारची दुकाने असल्यामुळे या दुकानांमधील टाकाऊ केरकचरा काहीजण तलावाच्या काठावर आणून टाकीत आहेत. यामुळे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या तलावाचे अस्तित्वही धोक्मयात येऊ लागले आहे. यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावषी झालेल्या पावसात तलाव अगदी तुडूंब भरला होता. या तलावात पाणीसाठा चांगला होऊ लागला आहे. या पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन करून तलावाचे पाणी गावासाठी व आजूबाजूच्या शेतीसाठीही वापरता येऊ शकते, असे काही शेतकऱयांनी सांगितले आहे. तलावाच्या बाजूलाच ग्राम पंचायतीची एक विहीर असून सध्या या विहिरीचे पाणी गावासाठी पुरविले जाते, अशी माहिती ग्रा. पं. माजी सदस्य राकेश तळवार यांनी दिली.
तलावाच्या काठावर पुनर्रोपण करण्यात आलेल्या मोठय़ा झाडांच्या बुंध्यांना पालवी फुटली आहे. यामध्ये पिंपळ व इतर जातीच्या झाडांचा समावेश आहे. ही झाडे मोठी झाल्यानंतर या परिसरात येणाऱया प्रवासी व वाटसरूंना सावलीचा आधार मिळणार आहे.
मच्छे भागातील काही सामाजिक संस्था व कारखानदारांनी या तलावासाठी सढळ हस्ते मदत केली आहे. तसेच ग्राम पंचायतीच्या रोजगार हमी योजनेंतर्गतही तलावाचे काही काम करण्यात आले असल्याची माहिती माजी अध्यक्षांनी दिली आहे. पिरनवाडी रस्त्यानजीक असलेल्या या तलावात कडक उन्हाळय़ातही पाणीसाठा आहे. ही या परिसरातील शेतकऱयांसाठी महत्त्वाची बाब आहे.
अलीकडे पिरनवाडी गावचा विस्तार वाढू लागला आहे. यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
तलावाच्या बाजूची दुर्गंधी रोखण्याची गरज
तलावाच्या काठावर व आजूबाजूच्या परिसरात काहीजण मलमूत्र विसर्जन करतात. अशा लोकांवर पहिल्यांदा निर्बंध आणले पाहिजेत. कारण तलावात चांगला पाणीसाठा आहे. मात्र, तलावाच्या आजूबाजूला मलमूत्र करण्याचे प्रकार अधिक वाढू लागल्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल व सामाजिक बांधिलकीचा विचार करून या तलावाचे सौंदर्यीकरण टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– मनोहर बिंदले
उद्यान बनविण्यास वाव
पिरनवाडी रस्त्याच्या बाजूला असलेला हा तलाव गावच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. या तलावाच्या काठावर लावण्यात आलेली झाडे बहरून आलेली आहेत. तलावाच्या आजूबाजूला अजूनही बऱयापैकी उद्यान बनविण्यास वाव आहे. तसेच पाणीसाठा असून या पाण्याचा उपयोग आम्हा गावकऱयांसाठी होऊ शकतो. यासाठी संबंधित खात्याने व ग्रा. पं. ने विशेष प्रयत्न करावेत, अशी आमची मागणी आहे.
– विठ्ठल मुचंडीकर
पाणी शुद्धीकरण यंत्र बसवा
तलावात पाणीसाठा चांगला आहे. मात्र, परिसरात स्वच्छता नसल्यामुळे हे पाणी नागरिकांसाठी खरोखरच उपयोगाचे आहे का? याकडे कोणाचेही लक्ष नाही. उन्हाळय़ात पाण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत या तलावातील पाण्याचा उपयोग होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रा.पं.मार्फत विशेष कर्मचाऱयाची नेमणूक करणे गरजेचे आहे. तसेच तलावाच्या बाजूला पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्याची गरज आहे.
– विजयानंद नेसरकर