वार्ताहर / किणये
अतिवृष्टीमुळे बेळगाव-पणजी महामार्गावरील पिरनवाडी नाक्याजवळ पाणीच पाणी झाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.
महामार्गावरच पाणी आल्यामुळे पिरनवाडी नाक्यापासून ते ब्रह्मनगरपर्यंतचा रस्ता बंद झाला. त्यामुळे एका बाजूनेच वाहतूक सुरू करण्यात आली होती.
खादरवाडीचे धरण ओव्हरफ्लो झाले असून पिरनवाडी नाल्यावर अतिक्रमण झाले असल्यामुळे पाणी थेट महामार्गावर येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची बरीच तारांबळ उडाली होती.