आंदोलनकर्त्या शेतकऱयांना मारहाण-अटक : हनुमंत परबना पोलिसस्थानकावर जबर मारहाण
प्रतिनिधी /वाळपई
पिसुर्ले भागातील शेतकरी बांधवांना निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत परब यांना वाळपई पोलिसांकडून जबर मारहाण करण्याचा प्रकार घडलेला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली असून लाथाबुक्क्मयांनी मारहाण करण्यात आल्यामुळे हनुमंत परब जबर जखमी झाले आहेत. धरणे आंदोलन करणाऱया 14 शेतकऱयांना वाळपई पोलिसांनी अटक करून रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका केली आहे.
दरम्यान पोलिसांकडून मारहाण करण्याचा प्रकार येणाऱया दोन दिवसात गंभीर वळण घेण्याची शक्मयता असून यामध्ये अनेक सामाजिक संस्था उतरण्याची शक्मयता निर्माण झालेली आहे. रात्री उशिरा हनुमंत परब यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न
पिसुर्ले पंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या शेती बागायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात खनिज माती पसरलेली आहे. यामुळे सदर जमिनीमध्ये शेतीचे उत्पादन घेता येणे शक्मय नाही. खनिजमाती काढून शेतजमीन पूर्ववत करून द्यावी व शेती बागायतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली पीक नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकरी बांधवांनी पुढे केल्या होत्या. या संदर्भाचे निवेदन सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी मामलेदार कार्यालय, पोलिस स्थानक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 15 दिवसांपूर्वी सादर केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन या संदर्भात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी केली होती. अन्यथा धरणे आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.
दहा मार्चपासून सुरु आहे आंदोलन
एका बाजूने लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकनातून हाती घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पणजीमध्ये जाहीर करण्यात येत होता तर दुसऱया बाजूने पिसुर्लेतील शेतकरी बांधव खाण परिसरामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचे साधनासाठी धरणे आंदोलन करीत होते. गुरुवारी सकाळपासून सार्वजनिक सांगणे घालून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. मात्र पोलिस यंत्रणा पणजी या ठिकाणी व्यस्त असल्यामुळे गुरुवारी त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही.
शुक्रवारी अचानक पोलीस दाखल
शुक्रवारी खाण खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होणार या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा धरणे आंदोलनाला सुरुवात केली. दामोदर मंगलजी कंपनीच्या परिसरातून सरकारने ई लिलाव पद्धतीने लिलाव केलेल्या मालाची वाहतूक सकाळपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र याचवेळी पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याशी झालेल्या वादावादीत सर्व शेतकरी बांधवांना ताब्यात घेण्यात आले व एका वाहनातून त्यांना वाळपईच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांना पोलीस कोठडीत डांबण्यात आले.
हनुमंत परब याना लाथाबुक्मयानी दुर्दैवी मारहाण
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व शेतकऱयांना कोठडीत डांबण्यात आल्यानंतर हनुमंत परब यांना डिचोलीचे पोलीस उपधीक्षक सागर एकोस्कर व वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी लाथाबुक्क्मयांनी मारहाण केली. हनुमंत परब यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनीही आपल्याला जमिनीवर लोळवून जबर मारहाण केल्याचे हनुमंत परब यांनी स्पष्ट केले आहे. अश्लील शब्दात शिवीगाळ करून पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात जबर मारहाण करण्यात आलेली आहे. यामुळे आपल्या डोळय़ाला इजा पोहोचली असून सर्वांगाला दुखापत झालेली आहे. वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आपल्याला गंभीर दुखापत झाल्याचे हनुमंत परब यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दोन्ही अधिकाऱयां विरोधात तक्रार करणार
दरम्यान पोलीस अधिकारी सागर एकोस्कर व प्रज्योत फडते यांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. गरज पडल्यास उच्च न्यायालयामध्ये दाद मागू मात्र पोलिसांनी केलेल्या दहशतीच्या विरोधात गप्प बसणार नसल्याचा इशारा हनुमंत परब यांनी दिलेला आहे
शेतकऱयांकडून तीव्र निषेध
या संदर्भात शेतकरी बांधवांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केलेला आहे. जयेश्वर गावडे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खाण परिसरात आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले होते. कुणालाही त्रास केला नव्हता, असे असतानाही पोलिसांनी दहशत करून आम्हाला पूर्वसूचना न देता अटक करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार हा खरोखरच दुर्दैवी असून सरकारचे डोळे बंद आहेत की काय अशा प्रकारचा सवाल केलेला आहे. शेतकरी संघटनेचे सचिव बाबुसो गावकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकार शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीवर बुलडोजर फिरविण्याचे काम करीत आहे. ईश्वर त्याना निश्चित शिक्षा देईल अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली व हनुमंत परब यांच्या विरोधात तीव्र स्वरूपात संताप व नाराजी व्यक्त केली.