तुडुंब भरलेल्या पाण्याचा साठा उपसण्यासाठी गेलेले अधिकारी माघारी
वाळपई / प्रतिनिधी
पिसुर्ले पुरातन महादेव मंदीराच्या गुंफा याठिकाणी जाणारा रस्ता खाण मालक आर.एन. शेट्टे यांनी अडवण्यात आल्यामुळे देवस्थानाचे धार्मिक प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्याचप्रमाणे सदर भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाला असून या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या जलसिंचन खात्याच्या अधिकाऱयांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येणाऱया काळात या खंदकात प्रचंड प्रमाणात असलेल्या पाण्यामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात तक्रार महादेव मंदिराच्या भाविक व नागरिकांनी सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर याना दिली आहे.त्याच प्रमाणे या तक्रारीचे अनुसरून रस्ता अडविणाऱया खाण मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन हनुमान या संदर्भात निवेदन हनुमंत परब यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आले . याबाबतची माहिती अशी की पिसुर्ले याठिकाणी इतिहासकालीन महादेव मंदिर व व पारंपारिक गुंंफा आहेत. हा परिसर पूर्णपणे खाण परिसरात येत आहे. यामंदिराकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता आहे. गेल्या शेकडो वर्षापासून या भागातील भाविक व नागरिक सदर मंदिरामध्ये देवदर्शनासाठी व इतर स्वरूपाचे धार्मिक उपक्रम पार पाडण्यासाठी जात असतात .सध्या श्रावणमास सुरू झाल्यामुळे सातत्याने या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जावे लागत असते. सोमवारी सकाळी हनुमंत परब व इतर भाविक मंडळी सदर देवस्थानात गेले असता हा रस्ता आर एन. शेट्टे यांच्या यापरिसरात रस्त्यावर आडकाठी घालून अडविण्यात आला आहे. यामुळे भावीक नागरिक सदर देवस्थानापशी जाऊ शकले नाहीत.
कृतीचा तीव्र संताप.
दरम्यान देवस्थानच्या परिसराकडे जाणारा रस्ता खाण मालकांना अडविण्यात आल्याची माहिती पिसुर्ले गावांमध्ये पसरताच संताप व्यक्त करण्यात आला. या मंदिराला पुरातन इतिहास असून सदर ठिकाणी जाण्यासाठी अजूनपर्यंत कोणीही रस्ता अडविला नव्हता. मात्र या खाण मालकांने धाडस करून हा रस्ता कसा काय अडविला अशाप्रकारचा सवाल उपजिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी सदर खाण मालकावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी हनुमंत परब व इतरांनी केली आहे.
खंदकातील पाण्याचा साठा धोकादायक वळणावर.
दरम्यान सदर ठिकाणी असलेल्या खंदकामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. हा पाण्याचा साठा पंपिंगच्या माध्यमातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या खाण परिसरावर सरकारचा कब्जा असल्यामुळे आज सकाळी वाळपई जलसिंचन खात्याचे साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे व कनि÷ अभियंता आझिझ शहा पंप बसवण्यासाठी गेले असता त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. रस्ता अडविण्यात आल्यामुळे आणण्यात आलेले पंप नियोजित ठिकाणी घेऊन जाता आले नाही. यामुळे पंपिंगचे काम येणाऱया काळात होऊ शकत नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेल्या पाण्याच्या साठय़ामुळे नदी ठिकाणी असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .यापूर्वी अशा खंदकातून पाण्याचा साठा लोकवस्तीमध्ये घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचा प्रकार यापूर्वी घडले घडलेला आहे. यामुळे याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना अशा प्रकारची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे