उदय सावंत / पिसुर्ले
2000 साली पिसुर्ले येथील पाण्याच्या प्रचंड भरलेल्या खंदकामध्ये पाण्याचा साठा फुटून पिसुर्ले येथील देऊळवाडा व हरिजवाडा व शेजारील वाडय़ावर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण झाले होते .यावेळी अनेक घरांना धक्के बसून शेती-बागायती प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली होती. आता पुन्हा एकदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका उद्भवलेला आहे .चार खाण कंपनीच्या खंदकामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा भरलेला आहे. सध्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. यासंदर्भात उपाययोजना न केल्यास कोणत्याही क्षणी या खंदकतील पाणी पुन्हा एकदा देऊळवाडा हरिजनवाडा या भागांमध्ये घुसण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
यामुळे सध्यातरी सदर वाडय़ावरील नागरिक प्रचंड भीतीच्या छायेखाली वावरत आहे. सध्या खाण कंपन्यांकडून पंपिंगद्वारे हा पाण्याचा साठा कमी करण्याचे काम बंद करण्यात आलेली आहे .यामुळे धोक्मयाची गडद सावली नागरिकांवर उद्भवलेली असून यासंदर्भात खाण संचनालय व गोवा सरकारने गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनलेली आहे.
यासंदर्भात माहिती अशी कि पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील एकूण चार कंपन्यांचे खाणकाम या खंदकामध्ये सुरू होते. त्या खंदकामध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे .कंपनीचे काम सुरू होते तेव्हा या खंदकात पाण्याचा साठा पंपिंगद्वारे बाहेर सोडण्याचे काम सुरू होते. 2012 नंतर खनिज व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यानंतर व सध्या खाणीचा परिसर पूर्णपणे सरकारच्या ताब्यात असल्यामुळे खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनाने पंपिंग प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे.
पाण्याची पातळी धोकादायक वळणावर.
दरम्यान सदर ठिकाणी भेट दिली असता एकूण पाण्याची पातळी वाढत असल्याचे सदर भागातील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी यावेळी स्पष्ट केले .गेल्या आठ दिवसात जवळपास दहा मीटर पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. यामुळे देऊळवाडा हरीजनवाडा यादोन्ही वाडय़ावर मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. 2000.साली अशाच प्रकारे कंपनीने सदर खंदकातील पाणी अडविण्यासाठी घातलेला बांध अचानकपणे फुटून दोन्ही वाडय़ावरील घरांमध्ये चिखल पसरून मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली होती .त्याचप्रमाणे सदर भागातील एकूण 80 एकर शेती पूर्णपणे चिखलामध्ये रुतलेली आहे.
पाण्याचे पंपिंग बंद.
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पावसाळय़ापुर्वी सदर पाण्याचा वापर या भागातील शेती बागायतीसाठी व्हावा यासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार जलसिंचन खात्याच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली होती . मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर जलसिंचन खात्याने ही प्रक्रिया पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यानंतर सरकारच्या निर्देशानुसार दोन कंपन्यांनी या ठिकाणी पंप बसवून सुरक्षितेच्या माध्यमातून पाण्याचे पंपिंगद्वारा नियंत्रण करण्यावर भर दिली होती.मात्र गेल्या वीस दिवसांपासून सदर पंपिंग कंपनी पूर्णपणे बंद केलेले आहे .यामुळे जवळपास दहा मीटर पाण्याची पातळी वाढलेली आहे.
2000 साली सदर खंदकातील पाण्याचा बांध फुटून वाडय़ावर निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थिती त्याची आठवण हनुमंत परब यांनी करून दिली त्याचवेळी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या ठिकाणी बांध फुटून पाण्याचा साठा घरामध्ये घुसला होता त्याचठिकाणी पुन्हा एकदा बांध पडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही . मध्यंतरी गोवा सरकारने गठित केलेल्या सुरक्षा समितीच्या माध्यमातून याची पाहणी केली आहे. मात्र त्यासंदर्भात उपाययोजना करण्याची गरज होती त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे हनुमंत परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
एतिहासिक महादेवाच्या गुफांवर जाण्याचा मार्ग पाण्याखाली.
दरम्यान सदर भागाची पाहणी केली असता सदर ठिकाणी असलेल्या एतिहासिक महादेवाच्या गुं?फाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे सदर देवस्थानात पुजा करण्यासाठी सध्यातरी भाविकांना मार्ग नाही. यदाकदाचित कंपनीने पंपिंगचे काम सुरू ठेवले असता तर हा रस्ता भाविकांसाठी मोकळा झाला असता मात्र हे पंपिंग बंद केल्यामुळे मार्ग बंद झाला असून दुसऱया बाजूने नागरिकांसमोर संकट निर्माण झालेली आहे.
पाण्याचा साठा जवळपास 150 मी.पेक्षाही जास्त.
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहिती सदर खंदकामध्ये जवळपास 150 मीटर खोल एवढा प्रचंड स्वरूपाचा पाण्याचा साठा आहे. सध्या बंद असलेल्या खाण कंपन्यांच्या कडा कोसळू लागल्यामुळे हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. यदाकदाचित मोठय़ा प्रमाणात कडक पोहोचू लागल्या तर पाण्याची पातळी आणखी वाढून कोणत्याही क्षणी भागामध्ये गंभीर व धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची भीती हनुमंत परब व इतरांनी व्यक्त केलेली.
शेतकरी संघटनेने सरकारचे लक्ष वेधले.
पिसुर्ले भागातील शेतकरी संघटनेने यासंदर्भात अनेक वेळा सरकारचे लक्ष वेधले आहे .यासंदर्भात निवेदने सत्तरी तालुक्मयाची उपजिल्हाधिकारी मामलेदार यांना देण्यात आलेली आहेत मात्र अजून पर्यंत ज्या पद्धतीने लक्ष देण्याची गरज होती. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे हनुमंत परब यांचे म्हणणे आहे .मध्यंतरी उपजिल्हाधिकारी यासंदर्भात पाहणी करून याबाबतचा अहवाल आपण सरकारला सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते .मात्र यासंदर्भात अजून पर्यंत सरकारची यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा हनुमंत परब यांचा आरोप आहे.