ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भविष्यात पाकव्याप्त काश्मीर देखील भारताचा भाग होऊ शकतो, असा ठाम विश्वास लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज व्यक्त केला. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सैन्यदलाशी निगडीत असलेल्या विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे, असा संसदीय ठराव आहे. जर, संसदेला ते हवं असेल तर तो भाग (पीओके) देखील आपलाच असायला हवा, जेव्हा आम्हाला या संदर्भातील आदेश मिळतील तेव्हा आम्ही योग्य कारवाई करू.