प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा बँकेच्या पीककर्ज घेतलेल्या शेतकऱयाना एक महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. दरवर्षी नियमितपणे 30 जूनअखेर चालणारी पीककर्ज परतफेडीची प्रक्रिया जुलै 2021 अखेरपर्यंत चालणार आहे. या शेतकऱयांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरविले जाणार आहे. तरी या सवलत योजनेचा शेतकऱयांनी लाभा घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए बी. माने यांनी केले आहे.
जुलैअखेरच्या वसुलीवर दंड व्याजाची आकारणी होणार नाही
जिल्हÎातील प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या व बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये वाढ होणार आहे. तसेच शेतकऱयांनाही कर्जाच्या परतफेडीची वाढीव मुदत मिळून शेतकऱयांना व्याज सवलतीच्या योजनेचाही लाभ होणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी नवीन कर्ज योजनेस पात्र ठरणार आहेत. 2020 -2021 चे मंजूर ऊस पीक व खावटी कर्ज वितरणास 31 जुलै 2021 अखेर मुदतवाढ मिळणार आहे. तसेच, ज्या विकास संस्थांची ऊस पीककर्ज खाती 30 जून 2021 रोजी नव्याने थकीत गेलेली आहेत, अशा कर्ज खात्यांवर जुलैअखेर आलेल्या वसूल रकमेवर दंड व्याजाची आकारणीही केली जाणार नाही.
थकबाकीत गेलेल्या शेतकऱयांना चांगली संधी
कोरोना आणि अन्य कारणामुळे काही शेतकऱयांना 30 जूनअखेर कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे त्यांना व्याज सवलती मिळणार नव्हती. शासनाच्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे थकबाकीत गेलेल्या शेतकऱयांना चांगली संधी मिळाली आहे. -डॉ. अशोक माने, सीईओ, जिल्हा बँक