प्रतिनिधी / आटपाडी
कर्जमाफी जाहीर झालेली असतानासुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँका आणि सोसायटी कर्ज द्यायला तयार नाहीत आणि त्यावर राज्य सरकार विरोधक आणि शेतकरी संघटना गप्प आहेत अशावेळी किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करेल अशी घोषणा किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अरुण माने यांनी केली आहे.
माने म्हणाले पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर फौजदारी करू अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केले आहे वास्तविक हे काम सहकार मंत्र्यांनी केले पाहिजे होते. जिल्हा बँका शेतकर्यांना सोडून इतर सर्व घटकांना कर्ज द्यायला तयार आहेत मग या शेतकऱ्यांच्या कशा मानायच्या? उद्या ते सोसायट्यांनी कर्ज नाकारले असे म्हणू शकतात मग गृहमंत्री फौजदारी सोसायट्यांवर करणार कि जिल्हा बँकांवर याचा खुलासा सरकारने करावा. महापूर अतिवृष्टी पाऊस दुष्काळ आणि कोरणा अशा विविध कारणांमुळे शेतकरी पिचला आहे .
राज्यातील बहुतांश जिल्हा सहकारी बँका या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत आणि तेच कर्ज देत नाहीत अशा वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गप्प आहेत आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तरी ते नाही देणार आहेत का नाही? व्यापारी कारखानदार कामगारांना मदत देऊ असे म्हणणारे सरकार केंद्राच्या असो किंवा राज्याचे ते शेतकरी अडचणीत आहे म्हणून त्याला मदत करावी असे म्हणत नाहीत. शेतकऱ्यांच्या संघटना म्हणून वावरणाऱ्या राज्यातील संघटनांना फक्त पैसा असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न दिसतो त्यामुळे जिरायती आणि सामान्य शेतकऱ्यांसाठी ते झटत नाहीत त्यामुळे यापुढे जर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसेल तर किसान सभा गाव आंदोलन उभा करेल असं सांगून आणि म्हणाले प्रत्येक शेतकऱ्याला पिकासाठी कर्ज मिळालेच पाहिजे अन्यथा राज्यातच नव्हे तर देशभर गंभीर वातावरण निर्माण होईल ते व्हायचं असेल तर सरकारने कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे.