प्रतिनिधी/ बेळगाव
आनंदवाडी येथील पी. के. क्वॉर्टर्सची इमारत मोडकळीला आल्याने दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी येथील क्वॉर्टर्सची गॅलरी कोसळून बाप-लेक जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. मनपाचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी पोलिसात तक्रार करू नये याकरिता मनपा अभियंत्यांचा आटापिटा सुरू आहे.
येथील एक इमारत मागील वषी हटविण्यात आली होती. या ठिकाणी इमारत बांधून बाजूच्या इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. याचा फटका स्वच्छता कामगारांना बसला आहे. या क्वॉर्टर्समध्ये वास्तव्यास असलेले संतोष कोलकार जेवण करून शनिवारी रात्री आपल्या मुलीसोबत गॅलरीमध्ये बसले असता सदर गॅलरी अचानकपणे कोसळली. गॅलरीसोबत संतोष कोलकार व त्यांची चार वर्षाची चिमुकली श्रावणी कोलकार खाली कोसळले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. संतोष कोलकार यांच्या पायाला व पाठीला मुका मार बसला आहे. मुलगी श्रावणीला पाठीसह डोक्मयाला मार बसला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांना उपचारासाठी शनिवारी रात्री तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमध्ये चार दुचाकी वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचा त्यांचा विचार होता. पण तक्रार नोंदवू नये याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी आटापिटा चालविला आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते रविवारी सकाळपासून पी. के. क्वॉर्टर्स येथे ठाण मांडून होते. जखमी झालेल्यांच्या खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवून तक्रार नोंदविण्यास आक्षेप घेतला आहे. खर्च देऊ पण तक्रार नको, असा दबाव घालून मनपा अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न रविवारी सकाळपासून सुरू होता. त्यामुळे याबाबत तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. कोसळलेल्या इमारतीचे साहित्य तातडीने हटवून स्वच्छ करण्यात आले. कोणताही अनर्थ घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी बांबू लावून उपाययोजना राबविण्यात आल्या. पी. के. क्वॉर्टर्स येथील इमारत जीर्ण झाल्याचे सांगून हटविण्याची कारवाई मागील वषी महापालिकेने केली होती. त्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण याकडे दुर्लक्ष झाले आहे. या शेजारी असलेल्या 72 क्वॉर्टर्सची इमारतदेखील मोडकळीस आली असून, इमारतीचे छत कोसळणे, गॅलरी कोसळणे, भिंतीचा गिलावा कोसळणे असे प्रकार सुरूच होते. पावसाळय़ात गळती लागून घरात पाणी शिरत होते. याबाबत मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱयांनी महापालिकेकडे तक्रार करून दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष दिले नाही. येथील सर्व इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. पण मागील वषी येथील एक इमारत हटविण्यात आली होती. त्या ठिकाणी नवी इमारत बांधून स्वच्छता कामगारांचे स्थलांतर करण्यात येईल व नंतर दुसरी इमारत हटवून नवीन क्वॉर्टर्स बांधून देण्यात येतील, असे अधिकाऱयांनी सांगितले होते. मात्र वर्ष झाले तरी नव्या इमारतीचा पत्ता नाही. येथील जुन्या क्वॉर्टर्सच्या दुरुस्तीकडेही मनपाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला होता. अखेर मनपाच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षाचा फटका स्वच्छता कामगारांना बसला आहे. गॅलरीची पडदी कोसळून घडलेल्या घटनेत बाप-लेक जखमी झाले आहेत. त्यामुळे या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.