प्रतिनिधी/ गोडोली
सातारा शहर आणि परिसरात जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणाया मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. विसावा जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या जलवाहिनीवर तब्बल10 फुट काँक्रीट फोडून गळती काढावी लागणार असल्याने गोडोली, विलासपूर, शाहूनगर, सदरबझार, संभाजीनगर, गोळीबार मैदान, खिंडवाडी परिसरात भर पावसाळ्यात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नदीवर पुर परिस्थिती कायम असताना पाणी पुरवठा करणाया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरळीत पाणी पुरवठा केला गेला. मात्र शनिवारी 24 रोजी सकाळी विसावा जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला.
पुढील तीन दिवस गळती काढण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोडोली, विलासपूर, संभाजीनगर, शाहूनगर, सदरबझार, गोळीबार मैदान, खिंडवाडी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवार पासून पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल असे,जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे आणि उप अभियंता शिवाजी माने यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.