दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विधान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला शब्दाला जागणारा ठरवत पुढील निवडणुकीपूर्वी यमुना नदीतून कचरा हटविणार असल्याचे म्हटले आहे. 2025 च्या निवडणुकीपूर्वी यमुना इतकी स्वच्छ होईल की कुणीही त्यात स्नान करणे टाळणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यमुनेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी 6 सूत्री कार्ययोजनेची घोषणा केली.
फेब्रुवारी 2025 ला यमुना नदीला स्नानयोगय मानकांपर्यंत स्वच्छ करण्यासाठी आमच्या सरकारने 6 सूत्री कार्ययोजना तयार केली आहे. नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण केले जात असून जुन्या प्रकल्पांना तांत्रिकस्वरुपात अद्ययावत करण्यात येत आहे. यामुळे आमची सांडपाण्यावरील प्रक्रिया क्षमता सुमारे 600 दशलक्ष गॅलन प्रतिदिन (एमजीडी) पासून वाढून 800 एमजीडी होणार आहे. यमुना नदीत नजफगढ, बादशाहपूर, सप्लिमेंट्री आणि गाझीपूर या चार प्रमुख नाल्यांचे पाणी येते. या नाल्यांमध्येच पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यमुनेत औद्योगिक कचरा लोटणाऱया उद्योगांना बंद करू असे केजरीवाल म्हणाले.
6 सूत्री कार्यक्रम
‘झोपडपट्टी’मधून येणाऱया अस्वच्छ पाण्याला सीव्हर नेटवर्कशी जोडले जाईल. सीव्हर नेटवर्क असलेल्या क्षेत्रांमध्ये घरगुती कनेक्शन उपलब्ध करविणार आहे. आमचे इंजिनियर्स आणि अधिकाऱयांना 6 सूत्री कार्ययोजना लागू करून फेब्रुवारी 2025 पर्यंत यमुना साफ करू शकू अशी अपेक्षा आहे. प्रत्येक कारवाई सूत्रासाठी विशिष्ट लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून मी वैयक्तिक स्वरुपात यावर देखरेख ठेवणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल सरकार दबावात प्रदूषणावरुन दिल्ली सरकारवरील दबाव सातत्याने वाढतोय. छठ पूजेपूर्वी यमुना नदीत तरंगत्या विषारी फेसाच्या वृत्तांमुळे दिल्ली सरकारवर टीपेचा भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी केजरीवालांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली होती. दिल्ली सरकारने प्रदूषणावर काम करण्याऐवजी प्रतिमा निर्मितवर अधिक खर्च केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाप्रकरणी केजरीवाल सरकारला फटकारले आहे.