ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाऊन घोषणा केली आहे. सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची संख्या एक हजार च्या वर पोहचली आहे. लॉक डाऊन च्या परिस्थितीतही काही लोक मोठ्या प्रमाणात शहराकडे गावाकडे स्थलांतर करत आहेत. त्यातच संपर्काचे साधन असलेल्या मोबाईल मधील बॅलन्स संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी एक महिना मोफत कॉलिंग ची सुविधा द्यावी अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडे केली आहे.
याबद्दल माहिती देताना प्रियांका गांधी म्हणाल्या, लॉक डाऊन च्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणारे कामगार व गरिबांकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे पुढील एक महिना टेलिकॉम कंपन्यांनी मोफत इन्कमिंग औटगोईंग ची सुविधा द्यावी असे म्हटले आहे. जेणे करून गरिबांना नातेवाइकांशी बोलताना अडचण येणार नाही असं ही त्या यावेळी म्हणाल्या.