- मुंबईकरांनो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका
ऑनलाईन टीम / मुंबई :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पश्चिमेकडील प्रवासच्या पार्श्वभूमीवर 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra: Rain continues to lash Mumbai; visuals from Western Express Highway at Vile Parle
— ANI (@ANI) June 12, 2021
Regional Meteorological Center, Mumbai says ‘moderate to heavy’ rainfall is likely to occur in Mumbai & suburbs with ‘possibility of very heavy rainfall at a few places’ during 48 hrs pic.twitter.com/jmlLUsYctM
पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Thane around recd very heavy rainfall (> 120mm) in last 24 hrs at isol places in last 24hrs at 8.30am.Boriwali 132mm,Thane 109.2mm, TMC 123.6mm.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 12, 2021
Mumbai Scz 107mm & half of it occured in night as typical Mumbai style. Palghar 144.4 Rtn 92.9
Today also hvy RF warnings by IMD pic.twitter.com/nQVZ83pJmD
- मुंबईत केवळ 11 दिवसात पडला महिनाभराचा पाऊस
दरम्यान, काल देखील मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाची तीव्रता काही काळासाठी वाढून नंतर उपनगरात संततधार सुरूच आहे. मागील 24 तासात मुंबईत 107 मिमी पाऊस झाला. तर जून महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजेच 11 दिवसात 505 मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली. मागील 11 दिवसात 565.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र: मुंबई में लगातार हो रही बारिश से अंधेरी सबवे में जलभराव हो गया। pic.twitter.com/5DPCebBWJn
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2021
- मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर वाढला
पहाटेपासूनच मुंबई आणि आसपासच्या उपनगरात जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, सायन, नालासोपाऱ्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहे. तर अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले आहे. जोगेश्वरी मधील रस्ते पाण्याखाली गेले असल्याने वाहन चालवणाऱ्यांची गैरसोय होताना दिसत आहे. दरम्यान, आजपासून विकेंड असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी आहे. तसेच अत्यावशक काम असेल, तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे.