वसगडे / वार्ताहर
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची ऊसाच्या एफआरपी बाबतच्या कडेगांव येथील बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हि बैठक पुन्हा १८ नोव्हेंबरला घेणेच ठरले असून त्या बैठकीत एफआरपी अधिक दोनशे रुपये ही संघटनेची मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या पुणे पदवीधर निवडणूकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहित धरु नये व त्यापुढे होणार्या आंदोलनासाठी कारखानदार जबाबदार असतील.
असे मत जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी व्यक्त केले आहे. दिवाळी नंतर आंदोलनाला गती देण्यात येणार असुन शेतकर्यांनी मोहाला बळी न पडता ऊस तोडी घेऊ नये असे आवाहान राजोबा यांनी यावेळी केले आहे.
यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, अॅड. एस. य. संदे, राज्य प्रवक्ता स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले,पलूस तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे ,युवा आघाडी अध्यक्ष- धन्यकुमार पाटील, राजू माने, भागवत जाधव, इमरान पटेल,शिराळा तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.