पूरबाधित गावांत करणार स्वच्छता व निर्जंतुकीकरण, सफाई सेवकांच्या पथकाकडून स्वछता मोहिम सुरु
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिलह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीचा सामाना करावा लागला असून त्यामध्ये 411 गावे बाधीत झालेली आहेत. विशेषत: शिरोळ, करवीर व हातकणंगले या तालुक्यातील गावांमध्ये मोठÎा प्रमाणात पाणी शिरल्याने अस्वच्छता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत पूर ओसरत असून मोठÎा प्रमाणावर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम करण्यासाठी जिह्यात उपलब्ध असणारे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यासाठी जि.प.च्या पाणी व स्वच्छता विभागाने पुणे महानगरपालिकेकडील 50 स्वच्छता सेवकांची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन पुणे मनपाचे स्वच्छता सेवकांचे पथक कोल्हापूरात दाखल झाले असून त्यांनी स्वच्छता मोहिम देखील सुरु केली आहे.
कोल्हापूरमधील सध्याच्या बिकट परिस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांकडे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कार्यरत सफाई सेवक व मुख्य विभागाकडील काही पर्यवेक्षकीय स्टाफ यांना कोल्हापूर येथे पाठविल्यामुळे स्वच्छतेच्या कामात मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही मदत होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील 61 पर्यवेक्षीय स्टाफ व सफाई सेवकांस सार्वजनिक स्वच्छतेच्या कामासाठी मदतनीस म्हणून कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
पुणे महानगरपालिकेकडील कर्मचारी व सेवक 30 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर येथे आपले योगदान देणार आहेत. आवश्यक स्वच्छतेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्यांना परत जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत चालक व मेकॅनिकसह 2 मोठÎा बसेस आणि मोटार वाहन विभागामार्फत 1 युटीलिटी व्हॅनची व्यवस्था करणेत आली. या सर्व सेवकांना कामकाजासाठी आवश्यक साहित्य व सुरक्षा प्रावरणे देण्यात आली आहेत.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील उप आयुक्त अजित देशमुख यांनी स्वच्छता सेवकांचे पथक कोल्हापूरला पाठवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
डॉ.कुणाल खेमनार यांचा कोल्हापूर जिह्याशी जिव्हाळा कायम
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सध्याचे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांचा आजही कोल्हापूर जिह्यासोबत जिव्हाळ्याचे नाते कायम आहे. महापूराच्या आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने पुणे महानगरपालिकेकडे सफाई सेवक आणि कर्मचाऱयांची मागणी केल्यानंतर ती तत्काळ पुरविण्यासाठी डॉ. खेमनार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच कोल्हापूरला तत्काळ मदतीचा हात मिळाला आहे.