संगोळ्ळी रायण्णा पुतळा प्रकरण, रात्रीच्या अंधारात उभारणी झाल्याने गोंधळ
वार्ताहर/ किणये
पिरनवाडीत संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गावर पिरनवाडी नाक्मयाजवळ अंधाराचा फायदा घेत क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारला. एकाच चौकात दोन पुतळे नको, असा ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, शुक्रवारी मराठी भाषिक नागरिक या पुतळय़ाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवरायांचा पुतळा आहे. याच चौकाच्या बाजूला क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा रातोरात बसविल्यामुळे पिरनवाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारण्यासाठी आपला विरोध नाही. मात्र हा पुतळा अन्य ठिकाणी उभारावा, असा पवित्रा मराठी भाषिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला व शुक्रवारी सकाळी रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जनसमुदाय एकवटला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस आयुक्त त्यागराजन व पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले अखेर पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून वातावरण शांत केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारणीवरून वातावरण तापलेलेच आहे. एकाच चौकात दोन महापुरुषांचे पुतळे नकोत, यामुळे गावात वारंवार वाद निर्माण होण्याची शक्मयता आहे. यासाठी शिवप्रेमांनी संगोळ्ळी रायण्णा पुतळा चौकात उभारण्यासाठी पहिल्यापासूनच विरोध दर्शविला होता. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी यासंदर्भात दि. 29 रोजी दोन्ही समाजाच्या नागरिकांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचे सांगितले होते. मात्र अंधाराचा फायदा घेऊन संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.
वाहतूक विस्कळीत, बेळगाव- चोर्ला रस्त्यावर वाहनांच्या रांगा
शिवप्रेमींनी रस्त्यावर आंदोलन छेडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग व बेळगाव- चोर्ला रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
1999 साली पिरनवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. याची सर्व रितसर नोंद ग्राम पंचायतीमध्ये करण्यात आलेली आहे, असे असतानाही काही बाहेरील कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गावात येऊन पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले होते.
शुक्रवारी सकाळी जमलेल्या नागरिकांना शांत करणे अवघड झाले होते. यामुळे मोठा पोलिस फौजफाटा बोलावून घेण्यात आला व काही कार्यकर्त्यांवर लाठीहल्लाही करण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीतच मध्यरात्री संगोळ्ळी रायाण्णा यांचा पुतळा उभारण्यात आला मात्र या प्रकाराला विरोध करणाऱया कार्यकर्त्यांवर मात्र लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. गावातील आप्पाजी मुचंडीकर, सचिन गोरल, बाळू मुचंडीकर, पिराजी शिंदे, पिराजी मुचंडीकर, मनोहर बिंदले, नंदू नेसरकर, सचिन राऊत, सतिश राऊत, जोतिबा लोहार आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱयांचे आश्वासन
पिरनवाडीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन एकाच ठिकाणी दोन महापुरुषांचे पुतळे नकोत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. येत्या दोन-तीन दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी पिरनवाडी ग्रामस्थांना दिले आहे.
चौकट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
राष्ट्रीय महामार्ग किंवा चौकात अथवा महामार्गाच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे स्मारक किंवा महापुरुषांचे पुतळे बसवू नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. पथदीप आणि हायमास्ट वगळता कोणत्याही प्रकारे रस्त्याचा दुरुपयोग करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे जिल्हा प्रशासनासह सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याच्या प्रतिक्रिया पिरनवाडीतील शिवप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहे.