ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुदुचेरीत व्ही नारायणस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे.
पुदुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेस आघाडीचे संख्याबळ 11 वर आले होते. तर विरोधी आघाडीकडे 14 सदस्य संख्या होती. त्यामुळे नारायणस्वामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी राजीनामा दिला होता.