ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी केलेले माजी मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी आज भाजपची साथ सोडली.
पुदुचेरीत 22 फेब्रुवारीला व्ही नारायणसामी यांचे सरकार कोसळले. हे सरकार पाडण्यासाठी एन रंगास्वामी भाजपसोबत गेले. मात्र, अमित शाह यांच्यावर नाराज असलेल्या रंगास्वामी यांनी भाजपची साथ सोडत अखिल भारतीय एन रंगास्वामी काँग्रेस नावाच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुदुचेरीत नवे राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, व्ही नारायणसामी यांचे सरकार कोसळल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास यापूर्वीच केंद्रीय मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे.