पूनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांचे केबीन सताड बंदच
प्रतिनिधी/ सातारा
अधिकारी बदलला की कार्यालयाचा कारभारही बदलतो असे म्हटले जाते. परंतु सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन विभागात कोणीही अधिकारी आले तरीही मागचे पाढे पंचावन्नच असा कारभार पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा असून या जिह्यातील पूनर्वसनाचे प्रश्न पिचत पडले आहेत. सध्या या विभागात कागदपत्रांनाच पाय फुटू लागल्याचे दिसून येत आहेत. तर उपजिल्हाधिकारी यांचे केबीन सताड बंद असते.
सातारा जिह्यातील अनेक गावांनी आपल्या जमीनी, आपली घरेदारे ही धरणांसाठी दिली गेली आहेत. विस्थापित धरणग्रस्तांचे आजही प्रश्न तसेच भिजत पडलेले आहेत. अनेकदा आंदोलने झाली आहेत. जिह्यात कोयना, उरमोडी, वांग मराठवाडी, तारळी आदी धरणग्रस्त आजही न्यायासाठी झटत आहेत. शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. असे असताना पूनर्वसन कार्यालयात नेहमीच सावळा गेंधळ पहायला मिळतो. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलाली सुरु असल्याची नेहमी चर्चा होत असते. सध्या पूनर्वसनसाठी मनोहर गव्हाड हे आले आहेत. त्यांचे केबीन सताड बंद असते.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या विभागात सर्वच जुन्या फाईल्सची हलवाहलवी सुरु केली आहे. फाईलींचे गठ्ठे तसेच कार्यालयात अस्ताव्यस्त लागलेले दिसत आहेत. यामुळे फाईल्सना पाय फुटू लागल्याचे चित्र दिसत असून यातील एखादा कागद कुठे गहाळ झाला तर एखाद्या लाभार्थ्यांस पुन्हा वणवण भटकावे लागणार आहे. त्यामुळे नेमके काय सुरु आहे हा प्रकार याबाबत उलटसुलट चर्चा सुऊ होती.