प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ला तलावाच्या आवारात बुडा कार्यालयानजीक सर्वात उंच तिरंगा फडविण्याचे स्वप्न महापालिका प्रशासनाने साकार केले. पण तांत्रिक कारणामुळे पावसाळय़ात उतरविण्यात आलेला तिरंगा पावसाळा संपल्यानंतरही फडकविण्यात आला नव्हता. मात्र अलिकडचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून बुधवारी देशातील सर्वाच उंच तिरंगा डौलाने फडकू लागला आहे.
किल्ला तलाव आवारात सर्वात ऊच तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. मात्र हा ध्वज फडकविण्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रारंभी वाऱयामुळे हा ध्वज फडकविण्यात अडचण निर्माण झाली होती. हा ध्वज खूपच उंच असल्याने बेळगावच्या हवामानाचा अडथळा निर्माण झाला आहे. ध्वजाची उभारणी झाल्यानंतर वाऱयामुळे ध्वज खराब झाला होता. कंत्राटदाराने तीनवेळा हा ध्वज बदलला होता. पण पावसाचे पाणी आणि वारा यामुळे ध्वज फडकण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच पावसाच्या पाण्यामुळे ध्वजाचे वजन वाढले होते. परिणामी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ध्वज खाली- वर करण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रोपकरणे देखील वजनामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ध्वजाचा आकार लहान करून ध्वज फडकविण्यात आला होता. मात्र ध्वज फडकविणाऱया यंत्राचे चाक खराब झाल्याने 26 जानेवारी दिवशी हा ध्वज अर्ध्यावरच थांबला होता.
यंत्राच्या दुरुस्तीचे काम निघाल्याने ध्वज फडकविण्यात आला नाही. सदर ध्वज स्तंभ उभारलेल्या कंत्राटदाराला याबाबत माहिती देण्यात आली. ध्वजाची देखरेख करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असल्याने हे चाक दुरुस्त करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांनी केली होती. त्यामुळे चाकाच्या दुरुस्तीचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. पण हवामान खराब असल्याने दुरुस्ती करण्यात अडथळे निर्माण झाले होते. अखेर बुधवारी दुरुस्तीचे काम पूर्ण करून तिरंगा फडकविण्याचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. दुरुस्तीचे काम झाल्याने आता देशातील सर्वांत उंच तिरंगा डौलाने फडकू लागला आहे.