प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
प्रतिनिधी / सातारा
कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून यांचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा पुन्हा लॉकडाऊन होणार अशी अफवा पसरवली जात आहे. यामुळे घर ते बाजारपेठ असे चर्चेला उधान आले आहे. यामुळे सर्वत्र संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात लागू झालेल्या लॉकडाऊनचे नियम शिथील झाले आहेत. सातारा शहरासह जिह्यात जनजीवन पुन्हा पर्ववत होत आहे. मात्र, कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने कोरोनाची धास्ती सर्वत्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अशी चिंता सातारकर नागरिकांना लागून राहिली आहे.
जिह्यातील काही तालुक्यात गावकऱयांनी लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या पाठोपाठ साताऱयातही लॉकडाऊन होणार अशी अफवा वारंवार पसरवली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक ते व्यापारी वर्गात चर्चेला उधान आले आहे. लॉकडाऊन नको म्हणत काही लोक नियमांचे पालन करताना दिसत आहेत. याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे अफवांना बळी पडु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.