महिला कितपत सुरक्षित? नागरिकांचा प्रश्न : केवळ पुरुषांना राहण्याची सुविधा असताना काही महिलांना ठेवण्याचा प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील निराश्रीत आणि निराधार नागरिकांसाठी महानगरपालिकेने नाईट शेल्टर (निराश्रीत केंद्र) सुरू केले होते. मात्र याला म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने केवळ 2 केंदे सुरू ठेवण्यात आली आहेत. खासबाग परिसरात असलेल्या निराश्रीत केंद्रात केवळ पुरुषांना राहण्याची सुविधा असताना काही महिलांना ठेवण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
महानगरपालिकेने शहापूर, रिसालदार गल्ली, शाहूनगर आणि गोवावेस अशा विविध ठिकाणी निराश्रीतांसाठी नाईट शेल्टर सुरू केले होते. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था तसेच रात्रीच्यावेळी राहण्याची व्यवस्था करण्यात येत होती. प्रारंभी या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र त्यानंतर निराश्रीतांची रवानगी पुनर्वसन केंद्रात करण्यात आल्याने नाईट शेल्टरला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. यासाठी महानगरपालिकेला खर्च करावा लागत होता. त्यामुळे महानगरपालिकेने केवळ दोन ठिकाणी ही सुविधा सुरू ठेवली आहे. तसेच निराश्रीत केंद्रांची देखभाल करण्यासाठी स्व-साहाय्य संघांकडे जबाबदारी सोपविली होती. याकरिता महापालिकेकडून निधी मंजूर केला जातो.
शाहूनगर येथे महिलांसाठी आणि खासबाग येथील मनपाच्या इमारतीमध्ये पुरुषांना राहण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र खासबाग येथील निराश्रीत केंद्राबाबत नेहमीच तक्रारी होत आहेत. काहीवेळा या ठिकाणी मद्यपींच्या पाटर्य़ा चालत असल्याच्या तक्रारी देखील महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. तसेच या केंद्रात मोजकेच नागरिक वास्तव्य करीत असताना जास्त संख्या दाखवून निधी लाटण्याचा प्रकारही निदर्शनास आला होता. त्यामुळे हे केंद्र वादाच्या भोवऱयात सापडले होते. पण अलिकडे तर या केंद्रात महिलांना राहण्याची मुभा देण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. वास्तविक पाहता महिलांना राहण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसताना येथील व्यवस्थापनाने दोन महिलांना राहण्याची मुभा दिली आहे. त्यांच्याकडून सर्व कामे करून घेतली जातात. पण त्याबद्दल मोबदला दिला जात नाही. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
महिलांना राहण्याची व्यवस्था केल्यास आवश्यक सुविधा तसेच महिला अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. पण तशी कोणतीच तरतूद नसताना महिलांना राहण्याची मुभा कशी दिली? असा मुद्दा उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे निराश्रीत केंद्रात एका महिलेला दाखल करून घेण्यात आले. त्या महिलेची काही अर्जांवर सही घेतली तसेच कोऱया कागदावरही सही घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या केंद्रात कोणता गैर कारभार सुरू आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गरीब गरजुंसाठी दीनदयाल अंत्योदय योजनेखाली 2012 पासून निराश्रीत केंदे सुरू केली. बेघर तसेच पीडित व्यक्तींना राहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र या योजनेचा गैरवापर सुरू असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मनपा प्रशासन-संबंधित खात्याच्या वरिष्ठानी चौकशी करण्याची मागणी
काही संघ-संस्थांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना या ठिकाणी दाखल केले जाते. मात्र या ठिकाणी व्यवस्थित वागणूक दिली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींवर अत्याचार केला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. खासबाग येथे असलेल्या या केंद्रात केवळ पुरुषांना दाखल करून घेतले जाते. असा फलक असतानादेखील दोन महिला वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये एक 20 वर्षांची मतिमंद मुलगी असल्याचेही दिसून आले आहे. महिला अटेंडर नसताना कोणत्या आधारे या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जातो? तसेच या केंद्रात प्रवेश दिलेल्या महिला कितपत सुरक्षित आहेत, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे या निराश्रीत केंद्राची चौकशी महापालिका प्रशासन व संबंधित खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी करावी, अशी मागणी होत आहे.