ऑनलाइन टीम / मुंबई :
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांच्या संदर्भातील पुस्तक वाटप करण्यात आलं होतं. या पुस्तकातून सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याआधी या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर आरोप करत देशभर अराजकता माजविण्याचे षड्यंत्र काँग्रेसने रचले आहे. भादंवि कलम 120, 500, 503, 504, 505 आणि 506 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.
तसेच सावरकरांच्या बदनामीचे षड्यंत्र रचणाऱयांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.