प्रतिनिधी/बेंगळूर
पुरामुळे आसरा गमावलेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. त्याकरिता पुराचा फटका बसलेल्या भागातील घरांचे बांधकाम तीन महिन्यांत पूर्ण करा, अशी सूचना महसूल मंत्री आर. अशोक यांनी जिल्हाधिकाऱयांना दिली.
बुधवारी पूरग्रस्त जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूरग्रस्त जिल्हय़ांमध्ये घरांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत 50 टक्के घरांचा पाया पूर्ण होऊन दुसऱया टप्प्यातील बांधकामाला प्रारंभ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बांधकामांसाठी अनुदानाचा तुटवडा नाही. जिल्हाधिकाऱयांच्या खात्यात पुरेसा पैसा शिल्लक आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे घरे गमावलेल्यांना घरे बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यातील 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काही जिल्हय़ांमध्ये घरांची कामे अपेक्षित प्रमाणात सुरू नसल्याने जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक पीडिओंनी किमान 10 ते 20 घरांच्या कामांना चालना दिलेली असावी. अन्यथा अशा पीडिओंना निलंबित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. खेडय़ांमध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात स्थानिकांशी चर्चा केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी प्रत्येक महिन्यातून एकदा खेडय़ांना भेट द्यावी. त्याचप्रमाणे तहसिलदार, उपविभागाधिकारी यांना देखील खेडय़ांना भेटी देऊन महसूल खात्याशी संबंधित समस्यांविषयक समस्या सोडविण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.