ओटवणे/ प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरूर नुकसान झालेल्या ओटवणे व माडखोल गावातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील व्हावटवाडी मित्रमंडळाने धाव घेतली. या मित्रमंडळाने हरकुळ बुद्रुक येथुन सुमारे ७० किलोमीटरचा प्रवास करीत या दोन्ही गावच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
यावेळी व्हावटवाडी मित्रमंडळाचे सद्यस्य श्री सर्वेश महाडेश्वर, राजेंद्र महाडेश्वर, गणेश महाडेश्वर, गजानन महाडेश्वर, सुशांत ढवण, शैलेश सामंत, अभिजीत सामंत, योगेश महाडेश्वर, अक्षय वाळके, सुयश महाडेश्वर, गौरेश महाडेश्वर, गिरीश खोचरे, शुभम खोचरे, बाबली महाडेश्वर, संजय खोचरे, विजय महाडेश्वर, भाई खोचरे, विनोद खोचरे, जयदीप महाडेश्वर, एकनाथ महाडेश्वर, अमित खोचरे, नंदकिशोर बेळणेकर, यशवंत खोचरे, नामदेव महाडेश्वर आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीच्याजाणिवेतून पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, तूरडाळ, तेल, रवा, चहा पावडर, विक्स डबी, बटाटा, मुग, शेवया, चणे, कपड्याचे व अंगाचे साबण आदी जिवनावश्यक व गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या. या मंडळाला वितरणासाठी विनोद वालावलकर, विकास म्हाडेश्वर, दीपक गावकर यांचे सहकार्य लाभले.