सावंतवाडी / प्रतिनिधी:
23 जुलै ला झालेल्या स्थितीत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ते इन्सुली भागात मोठ्या प्रमाणात शेती बागायती व घरांचे नुकसान झाले.आहे याचे पंचनामे करण्यात आली असून नुकसानीचा आकडा ही निश्चित करण्यात आला आहे या नुकसान भरपाईची रक्कम शासनाने मंजूर केली आहे. ही नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी नुकसानग्रस्तांना च्या खात्यात जमा करावी ,अशा मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने सावंतवाडी नायब तहसीलदार श्री मुसळे यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी येत्या चार दिवसात नुकसानभरपाई खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब माजी उपसभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती मानसी धुरी, उमेश पेडणेकर, विठ्ठल पालव ,महेश धुरी,उमेश कोठावळे, औदुंबर पालव मंडल अध्यक्ष महेश धुरी, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, आदी उपस्थित होते. या पूरस्थिती शेतकऱ्यांची घरे शेती बागायती गोटे यांचे मोठे नुकसान झाले .अद्यापही या पूरस्थिती तून लोक सावरलेले नाहीत. या सर्वांचे पंचनामे कृषी विभाग तलाठी यांनी पूर्ण केले आहेत आणि त्याचबरोबर शासनाने भरपाई मंजूर केली असून, महिना उलटला तरी अद्याप परत नाही भरपाई मिळाले नाही त्यामुळे कोकणातील आणि विशेषतः सिँधदुर्गातील गणेश चतुर्थी उत्सव हा मोठा आहे. या उत्सवाच्या काळात तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी श्री मुसळे यांनी येत्या चार दिवसात भरपाई योग्य पद्धतीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल शासनाचे अनुदान प्राप्त झाले आहे असे स्पष्ट केले.