वार्ताहर/ रामदुर्ग
पूरग्रस्तांसाठी दानशूरांकडून लोखंडी पत्रे आले आहेत. पण अवरादी ग्राम पंचायत पीडीओ व महसूल अधिकाऱयांनी ते पूरग्रस्तांना अद्याप दिलेले नाहीत. लाभार्थीवर ते अन्याय करीत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते चन्नबसवराज कुलकर्णी यांनी केला. ते येथील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले, मलप्रभा नदीस महापूर आल्यामुळे तालुक्मयात अनेक घरे पडली. या पूरग्रस्तांसाठी नऊ महिन्यांपूर्वीच लोखंडी पत्रे आले असून ते सुरेबान एपीएमसी गोडावूनमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याचे संबंधितांना वाटप करावे यासाठी आंदोलन केले असता बैलहोंगल उपविभागाधिकाऱयांनी घरे बांधून घेणाऱयांना पत्रे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. आता तालुका प्रशासनाला विचारले तर ते ग्राम पंचायतीकडे बोट करत आहेत.
शेतकरी व मजुराना रोजगार देण्याबाबत उद्योग खात्री योजनेद्वारे काम देण्यात येईल असे शासन सांगत असूनही पीडीओ व कॉम्प्युटर ऑपरेटर दोघेही उद्योग खात्री योजनेचे नियम बाजूस ठेवून यंत्राद्वारे कामे करून घेत आहेत.
स्वच्छ भारत योजनेंतर्गत एका बीपीएल रेशनकार्डधारकास दोन शौचालय बांधण्यासाठी रक्कम मंजूर करून अनुदानाचा दुरुपयोग करत आहेत. संबंधित अधिकाऱयांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा उग्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी एल. एस. पल्लेद, शिवानंद कुलकर्णी व मल्लय्या मनीहाळमठ उपस्थित होते.