पालकमंत्री गोविंद कारजोळ यांचा आदेश
प्रतिनिधी/ चिकोडी
आलमट्टी व हिप्परगी बॅरेजच्या बॅक वॉटरने बुडीत होणाऱया अथणी तालुक्मयातील जनवाड, महिषवाडगी, नंदेश्वरसह इतर गावातील घरांच्या सर्व्हेक्षणाचे काम करण्यात यावे. ग्राम पंचायतीतील नोंदीनुसार त्यांना हक्कपत्रांचे वितरण करण्यात यावे, असा आदेश जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिला.
चिकोडी येथे शनिवारी महापुराच्या पार्श्वभूमिवर अधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, आलमट्टी जलाशयाच्या पाण्यात बुडीत होणाऱया पूरग्रस्त कुटुंबांना यापूर्वीच भरपाई देण्यात आली आहे. त्यांना स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी मदत करावी. हक्कपत्रांचे वितरण करण्यात येणार असलेल्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यासोबत तेथे त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने या कुटुंबांचे कायमस्वरुपी स्थलांतर करण्यात यावे. आलमट्टीची जलाशय पातळी 524 मीटर असून त्यापेक्षा उंचवठय़ावर अशा कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे. महापूर व अतिवृष्टीने नादुरुस्त झालेले ट्रान्स्फार्मर व वीज उपकरणे तातडीने दुरुस्त करून नागरिक व शेतकऱयांना सुरळीत वीजपुरवठा करावा. यात हयगय करणाऱयांची गय केली जाणार नसल्याचा इशारा मंत्री कारजोळ यांनी दिला.
120 कोटी रुपयांचा निधी मंजूर
महापुराने हानी झालेल्या सेतू व इतर सुविधा पूर्ववत सुरु करण्यासाठी शासनाने 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अशी कामे तातडीने हाती घेण्यात यावीत. महापूर ओसरताच शेतीवाडीत फिरुन पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे. यातून नुकसान झालेली शेतजमीन वंचित रहाणार नाही याची खबरदारी घ्यावी. सरकारच्या भरपाईच्या रकमेपासून कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित रहाणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर निर्णय घेण्यात येतील. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करताना फोटो व त्या स्थळाचे व्हिडीओ संग्रहित करण्यात यावेत. अपात्रांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आढळल्यास अशा कर्मचारी व अधिकाऱयांच्या विरोधात गुन्हे नोंदविले जातील, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना आमदार पी. राजीव यांनी खेमलापूर, सिद्धापूर गावातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी जागा निश्चित करण्यात यावी. महापुराच्या काळात अनधिकृत घरात वास्तव्य केलेल्यांना भरपाई देण्यात यावी. सरकारी रुग्णालयातील औषधांची कमतरता कमी करावी. ऑक्सिजन प्रकल्पांचे काम गतीने करावे अशी मागणी केली. विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी बुडीत पूरग्रस्तांना तातडीने हक्कपत्रांचे वितरण करण्यात यावे. ग्रामसभा घेऊन त्यातील नागरिकांच्या मागणीनुसार पुनर्वसतीचे निर्णय घेण्यात यावेत. दरवषी पुरात बुडणाऱया रस्त्यांची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, दुर्योधन ऐहोळे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी युकेशकुमार एस. यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.