जिल्हाधिकाऱयांची नोडल अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी अधिकाऱयांची बैठक घेऊन शेतकऱयांना वेळेत खत पुरवठा करावा, तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या होत्या. याचबरोबर पूरपरिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच तयारी करा, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावषी किमान 500 निवारा केंद्रे स्थापन करावीत, असा आदेश दिला आहे.
राज्यामध्ये महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी येत असते. त्यामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांना पूर येतो. कृष्णा नदीच्या काठावरील 372 हून अधिक गावांना दरवषीच फटका बसत असतो. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच निवारा केंद्रांची उभारणी करावी, असे जिल्हाधिकाऱयांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नोडल अधिकाऱयांना सूचना केली आहे.
पुरामुळे गेल्या दोन वर्षांत तर बेळगाव जिल्हय़ातील अनेक तालुक्मयांना फटका बसला आहे. पुरामुळे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांसाठी दरवषी 100 निवारा केंद्रे स्थापन केली जातात. शाळा, मोठमोठी मंदिरे याचबरोबर विविध भवानांमध्ये त्यांची सोय केली जाते. मात्र यावषी कोरोना असल्यामुळे समस्या निर्माण होवू शकते. त्यासाठी नव्याने काही निवारा केंद्रे तयार करावीत, याचबरोबर गावाच्या बाहेर असलेल्या अनेक शाळा तसेच इतर इमारतींमध्येही त्यांची सोय करण्यासाठी तयारीला लागावे, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पूर यामुळे नदीकाठावरील गावांना मोठा त्रास होण्याची शक्मयता आहे. तेव्हा स्थलांतरित केलेल्या कोणत्याही कुटुंबाला त्रास होवू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाऱयाचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्मयता आहे. तेव्हा चाऱयासंदर्भातही काळजी घेण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे.