कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांची माहिती, 1 जूनपासून धरणातून विसर्ग सुरु
प्रतिनिधी / कोल्हापूर
पावसाचा अंदाज घेवून जिह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरु ठेवला आहे. धरणांतील पाणीसाठा जास्त असल्यामुळे पुरात धरणातून मोठÎा प्रमाणात विसर्ग होऊन पुराची तिव्रता वाढेल अशी जतनेच्या मनामध्ये भिती होती. त्यामुळे जिह्यात 2019 सारखी पूरस्थिती उद्भवू नये यासाठी पाटबंधारे विभाग सदैव प्रयत्नशील आहे. त्यानुसार 1 ते 15 जूनपर्यंत सर्व धरणातून विसर्ग सोडून गतवर्षीच्या आजच्या दिवसा इतका पाणीसाठा करण्यात पाटबंधारेला यश आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.
कोल्हापूर पाटबंधारेच्या उत्तर विभागांतर्गत 4 मोठे प्रकल्प, 12 मध्यम प्रकल्प , 60 ल.पा. प्रकल्प व 1 उपसा सिंचन योजना असे एकूण 77 प्रकल्प आहेत. त्यापैकी या विभागांतर्गत असणाऱया प्रकल्पांपैकी पंचगंगा खोऱयामध्ये 1 जून 2021 रोजी राधानगरी धरणात 34 टक्के , तुळशी 54 , कासारी 26 , कुंभी 41 टक्के पाणीसाठा होता. तसेच दुधगंगा खोऱयात दुधगंगा 32 टक्के व वारणा खोऱयात वारणा 42 तर कडवी धरणात 42 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा 1 जून रोजीचा पाणीसाठा जास्त होता. कारण उन्हाळी हंगामात मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यात पाण्याची मागणी नसल्यामुळे धरणामध्ये पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळेच 1 ते 15 जूनपर्यंत सर्व धरणांतून विसर्ग सुरु करून पाणीसाठा कमी केला आहे.
मागील 10 वर्षाचा पाणीसाठा पाहीला असता यावर्षी सर्वच धरणामध्ये त्याच्या सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा धरणांत ठेवला आहे. सर्व धरणावरील पॉवर हाऊस यावर्षी लवकर सुरु करुन अगोदरच मोठया प्रमाणावर विसर्ग करुन नंतरच्या पूराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आपत्ती व्यवस्थापन व पूरनियंत्रणासाठी विभागीय कार्यालयात 24 तास पूर नियंत्रण कक्ष 1 जून पासून सुरु करण्यात आला असून पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे लोकांनी पूराची भिती घेऊ नये, असे आवाहन बांदवाडेकर यांनी केले आहे.
सद्यस्थितीत धरणांतील पाणीसाठा
पंचगंगा खोऱयामध्ये राधानगरी धरणात 24 टक्के, तुळशी 49 टक्के , कासारी 28 टक्के , कुंभी 38 टक्के,, तसेच दुधगंगा खोऱयात दुधगंगा 26 टक्के वारणा 39 टक्के व कडवी 36 टक्के एवढा कमी ठेवण्यात आलेला आहे .